दहावी-बारावीच्या ‘या’ विद्यार्थ्यांचे शुल्क होणार माफ!

82

कोरोना या जीवघेण्या महामारीने शेकडो जीव घेतले आहेत. ज्या घरातील व्यक्ती कोरोनामुळे दगावली त्यांचं भरुन न काढता येणारं नुकसान झालं आहे. कोरोना काळात काही मुलांना आपल्या पालकांना गमवावं लागलं. पालकांना गमावलेले जे विद्यार्थी दहावी अथवा बारावीला आहेत. त्या विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे परीक्षांचे शुल्क घेतले जाणार नाही असे राज्य शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

 परीक्षा शुल्क घेतले जाणार नाही

दहावी आणि बारावी बोर्ड 2021-2022 या शैक्षणिक वर्षाची परीक्षा होणार आहे. पण, ज्या विद्यार्थ्यांनी या कोरोना महामारीच्या काळात आपल्या पालकांना गमावले त्यांच्यासाठी मात्र परीक्षांचे शुल्क भरणे आर्थिक अडचणींमुळे कठीण असल्याने राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क घेतले जाणार नसल्याचे ट्विट करुन स्पष्ट केले आहे.

काय म्हणाल्या शिक्षणमंत्री

कोरोना काळात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना आधार देण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून करण्यात आला आहे. पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षांचे शुल्क घेतले जाणार नाही. महामारीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या या मुलांना काहीसा दिलासा मिळावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही तुमच्या अडचणी जाणतो आधीच तुम्हाला ब-याच त्रासातून जाव लागलं आहे आणि आता आर्थिक अडचणीमुळे शिक्षण थांबायला नको, म्हणून शुल्क माफीचा निर्णय घेतल्याचं शिक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे.

 ( हेही वाचा:  धक्कादायक! महाराष्ट्राच्या सीमेवर धडकला ओमिक्रॉन )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.