राज्यात ५० हजार शिक्षकांची भरती होणार; दीपक केसरकरांची घोषणा

84
राज्यात ५० हजार शिक्षकांची भरती होणार; दीपक केसरकरांची घोषणा
राज्यात ५० हजार शिक्षकांची भरती होणार; दीपक केसरकरांची घोषणा

राज्यात ५० हजार शिक्षकांची भरती करण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी केली. पहिल्या टप्प्यात ३० हजार, तर दुसऱ्या टप्प्यात जवळपास २० हजार शिक्षकांची भरती केली जाईल, या संदर्भात लवकरच जीआर काढला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रियेची कार्यवाही पूर्ण होण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागेल. विद्यार्थ्यांचे आधार वेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीसंदर्भात आकडा सांगितला जाईल. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शिक्षकांची भरती करण्याचा आमचा मानस आहे. शंभर टक्के शिक्षक भरती करण्यासाठी संच मान्यता झाली पाहिजे, असेही केसरकर यांनी सांगितले.

(हेही वाचा – जगन्नाथ शंकरशेट नाना चौक माध्यमिक शाळेत कौशल्य विकास केंद्राची उभारणी)

गावानजिक नियुक्ती मिळणार

  • ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन आम्ही शिक्षकांच्या बदलीसंदर्भात सविस्तर चर्चा करू. तसेच, शिक्षक एकाच ठिकाणी स्थिर होण्यासाठी माध्यमिक शिक्षकांप्रमाणेच प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यादेखील रद्द करता येतील का, याबाबत महाजन यांच्यासोबत चर्चा केली जाईल.
  • प्रत्येक शिक्षकाला आपल्या गावातच नियुक्ती मिळेल असे नाही, मात्र जवळच्या गावात नियुक्ती देता येईल का, यासाठी प्रयत्न करू. एखाद्या शिक्षकाला अजिबात चांगले शिकवता येत नसेल, तर त्याच्यासंदर्भात वेगळे निर्णय घ्यावे लागतील.
  • आतापर्यंतच्या शिक्षकांची शिक्षा म्हणून बदली करावी लागायची. आता बदली न करता त्या शिक्षकांना ट्रेनिंग दिली जाईल, असेही केसरकरांनी नमूद केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.