CM Eknath Shinde : मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा धाडसी निर्णय घेतला

मनोज जरांगे पाटील प्रामाणिक भावना ठेऊन लढ्यात उतरले होते. पण त्यांनी वेळोवेळी मागण्या बदलल्या. मी त्यांना भेटायला जालन्याला गेलो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचे शांततेत ५६ मोर्चे झाले. पण यावेळेस कुठं आग लागली. कुठे दगडफेक झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

160
CM Eknath Shinde : मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा धाडसी निर्णय घेतला

मी शपथ घेतल्याप्रमाणे आमच्या सरकारनं मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा धाडसी निर्णय घेतला, असे (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सगेसोयऱ्यांबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. मात्र दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांची भाषा राजकीय आहे. त्यांच्या मागे कोणीतरी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत जरांगे पाटील यांनी केलेलं वक्तव्य योग्य नसल्याचे देखील एकनाथ शिंदे म्हणाले.

(हेही वाचा – MARD : निवासी डॉक्टरांचा संप मागे)

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांबद्दल चुकीची भाषा वापरणं आपली संस्कृती नाही :

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल चुकीची भाषा वापरणं ही आपली संस्कृती नाही. हे मनोज जरांगे पाटील यांना कोणी बोलायला लावतंय का? हे पाहावं लागेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आता आरक्षण दिल्यानंतर विरोधी पक्षाला अपेक्षित नव्हतं की इतक्या लवकर आरक्षण मिळेल. त्यामुळं ते टीका करत आहेत. त्यांना वाटलं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. हीच त्यांची भावना होती अे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली. सरकारनं मराठा आरक्षणासाठी काय केलं नाही ते सांगा. जनता सुज्ञ आहे. तुम्हाला जागा दाखवेल. त्यामुळं आंदोलनकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये असे (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

(हेही वाचा – Veer Savarkar : सावरकरांची राजनीती आणि विश्वगुरू हिंदुस्थान)

जरांगेंनी वेळोवेळी मागण्या बदलल्या :

मनोज जरांगे पाटील प्रामाणिक भावना ठेऊन लढ्यात उतरले होते. पण त्यांनी वेळोवेळी मागण्या बदलल्या. मी त्यांना भेटायला जालन्याला गेलो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचे शांततेत ५६ मोर्चे झाले. पण यावेळेस कुठं आग लागली. कुठे दगडफेक झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. जरांगे पाटील यांची आता जी भाषा आहे ती राजकीय आहे. त्यांच्या मागे कोणीतरी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत जरांगे पाटील यांनी केलेलं वक्तव्य योग्य नसल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. आमचं सरकार शेतकरी, महिला पायाभूत सुविधांना सरकारचं प्राधान्य देत आहे. मात्र, विरोधकांना राजकारणातच अधिक रस असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.