Biporjoy Cyclone : मुंबईच्या किनाऱ्यावर धुळीचे प्रचंड लोट; समुद्रही खवळलेला

बिपरजॉय चक्रीवादळाची (Biporjoy Cyclone) चाहूल देणारे जोरदार वारे मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबई परिसरात शनिवारी वाहत होते.

219
Biporjoy Cyclone : मुंबईच्या किनाऱ्यावर धुळीचे प्रचंड लोट; समुद्रही खवळलेला

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ‘बिपरजॉय’ (Biporjoy Cyclone) नावाचं चक्रीवादळ निर्माण झालं आहे.

‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा (Biporjoy Cyclone) भारतात प्रभाव दिसून येत आहे. 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बिपरजॉय चक्रीवादळ (Biporjoy Cyclone) येत्या २४ तासांत तीव्र रूप धारण करणार असून त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टीवर मोठय़ा प्रमाणावर जाणवू शकतो, मात्र मुंबईला त्याचा फारसा धोका नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. दरम्यान, शनिवारी (१० जून) जोरदार वाऱ्यांमुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात धूळ आणि वाळूचे लोट उसळले होते. तसेच समुद्रही खवळला होता.

(हेही वाचा – Biporjoy Cyclone : येत्या 36 तासात चक्रीवादळ अधिक तीव्र होणार ; ‘या’ चार राज्यांना सतर्कतेचा इशारा)

बिपरजॉय चक्रीवादळ (Biporjoy Cyclone) गोव्याच्या पश्चिमेस सुमारे ७०० किमीवर आणि मुंबईच्या नैऋत्येला ६३० किमीवर आहे. आगामी २४ तासांत ते आणखी तीव्र होऊन ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे. त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टी आणि गुजरातमध्येही जाणवेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

येत्या दोन दिवसांत बिपरजॉय चक्रीवादळाचा (Biporjoy Cyclone) प्रभाव मोठ्या प्रमाणात जाणवण्याची शक्यता आहे. वाऱ्यांचा ताशी वेळ ४० ते ५० किलोमीटर असणारा आता ताशी ६५ किलोमीटपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बिपरजॉय चक्रीवादळाची (Biporjoy Cyclone) चाहूल देणारे जोरदार वारे मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबई परिसरात शनिवारी वाहत होते. जोरदार वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी धुळीचे लोट उसळले. तसेच मुंबई शहर आणि उपनगरात १६ वृक्ष उन्मळून पडले.

या चार राज्यांना सतर्कतेचा इशारा

दक्षिण अरबी समुद्राच्या (Biporjoy Cyclone) आसपासच्या भागात 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. अशातच कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात या चार राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीपच्या किनारपट्टीपासून मच्छिमारांना दूर राहण्याचा सल्ला भारतीय हवामान खात्याने दिला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार बिपरजॉय चक्रीवादळ हे पुढील 36 तासांत आणखी तीव्र होणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.