बेस्ट बसला आग! गेल्या पंधरा दिवसातील दुसरी घटना

100

अंधेरी पूर्व परिसरात बेस्ट बसला शनिवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. दुपारी साडेतीनच्या सुमारास ही आग लागली ही बेस्ट उपक्रमाने भाडेतत्वावर घेतलेली बस होती. या दुर्घटनेत कोणताही प्रवासी जखमी झालेला नसून पुढील चौकशी स्थानिक पोलीस करत असल्याचे बेस्टने स्पष्ट केले आहे. पेट घेतलेली बस ही मातेश्वरी कंपनीची होती गेल्या पंधरा दिवसामधली ही दुसरी घटना असल्यामुळे भाडेतत्वावरील बसगाड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

( हेही वाचा : मुंबईकरांना हु़डहुडी; तापमान १६.६ अंश सेल्सिअसवर)

प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह 

२५ जानेवारीला वांद्रे एस व्ही रोड जंक्शन येथे सुद्धा मातेश्वरी कंपनीच्या बसने पेट घेतला होता. ही घटना ताजी असतानाच आता ११ फेब्रुवारी शनिवारी पुन्हा एकदा मातेश्वरी कंपनीच्या बसने पेट घेतला. भाडेतत्वावरील बसगाड्यांना आग लागण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये वाढ झाली आहे.

बेस्ट उपक्रम संपूर्ण मुंबई प्रवाशांना सेवा देते. नागरिकांना चांगली सुविधा देण्यासाठीही विविध योजना सुद्धा बेस्ट उपक्रमाकडून राबवल्या जातात. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये बेस्टचा प्रवासी वर्ग वाढला आहे. परंतु अशा घटना जर वारंवार घडत असतील तर प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.