Vande Bharat Express : आजपासून ९ ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू होणार

११ राज्यांच्या धार्मिक, पर्यटन आणि दळणवळण व्यवस्थेला यामुळे मदत मिळणार आहे

117
Vande Bharat Express : आजपासून ९ 'वंदे भारत एक्स्प्रेस' सुरू होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (रविवार, २४ सप्टेंबर २०२३) रोजी दुपारी १२:३० वाजता व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे ९ वंदे (Vande Bharat Express) भारत रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या नवीन सुरू झालेल्या रेल्वेगाड्या म्हणजे देशभरातील दळणवळण व्यवस्थेत सुधारणा आणि रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे म्हटले जात आहे.

राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, झारखंड आणि गुजरात अशा ११ राज्यांच्या धार्मिक आणि पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या ९ वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) रेल्वेगाड्यांमुळे देशातील दळणवळण व्यवस्था सुधारण्यासाठी मदत होणार आहे. यासंदर्भातील निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, या वंदे भारत एक्स्प्रेस उदयपूर-जयपूर, तिरुनेलवेली-मदुराई-चेन्नई, हैदराबाद-बंगळुरू, विजयवाडा-चेन्नई, पाटणा-हावडा, कासारगोड-तिरुवनंतपुरम, राउरकेला-भुवनेश्वर-पुरी, रांची-हावडा, आणि जामनगर-अहमदाबाददरम्यान धावतील. राउरकेला-भुवनेश्वर-पुरी आणि कासारगोड-तिरुवनंतपुरम मार्गावरील सध्याची सर्वात वेगवान रेल्वेगाडीच्या तुलनेत वंदे भारत एक्सप्रेस संबंधित गंतव्य स्थानांतील प्रवासाचा वेळ सुमारे तीन तासांनी कमी करेल. हैदराबाद-बंगळुरू मार्गावर अडीच तासांपेक्षा जास्त, तर तिरुनेलवेली-मदुराई-चेन्नई मार्गावरील प्रवासात दोन तासांपेक्षा जास्त वेळेची बचत होईल. रांची-हावडा, पाटणा-हावडा आणि जामनगर-अहमदाबाद दरम्यानचा प्रवासाचा वेळ सध्या उपलब्ध असलेल्या सर्वात वेगवान रेल्वेगाडीच्या तुलनेत सुमारे एक तासाने कमी होईल. उदयपूर-जयपूरदरम्यान या रेल्वेप्रवासात अर्धा तास कमी लागेल.

(हेही वाचा – One Nation One Election : कोविंद समिती राजकीय पक्षांशी करणार चर्चा)

महत्त्वाची धार्मिक स्थळे जोडली जाणार

देशभरातील महत्त्वाची धार्मिक स्थळे या रेल्वेगाड्यांमुळे (Vande Bharat Express) जोडली जातील. राउरकेला-भुवनेश्वर-पुरी वंदे भारत एक्सप्रेस आणि तिरुनेलवेली-मदुराई-चेन्नई वंदे भारत एक्सप्रेस पुरी आणि मदुराई या महत्त्वाच्या धार्मिक शहरांना जोडतील. याव्यतिरिक्त, विजयवाडा-चेन्नई वंदे भारत एक्सप्रेस रेनिगुंटामार्गे चालेल आणि तिरुपती या तीर्थक्षेत्राशी जोडले जाईल. यामुळे ११ राज्यांमध्ये सुरू झालेल्या वंदे भारत रेल्वेगाड्यांमुळे जागतिक दर्जाची सुविधा आणि सुरक्षेच्या दृष्टीने सुसज्ज असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक, व्यापारी, विद्यार्थी आणि पर्यटकांना आरामदायी प्रवास उपलब्ध करून देण्याच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल ठरतील, असे पंतप्रधानांचे म्हणणे आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.