मुंबईकरांचे पैसे खाल्ले कुणी? मुख्यमंत्र्यांच्या विशेष चौकशी समितीच्या स्थापनेमुळे येणार सत्य समोर

118
मुंबईकरांचे पैसे खाल्ले कुणी? मुख्यमंत्र्यांच्या विशेष चौकशी समितीच्या स्थापनेमुळे येणार सत्य समोर
मुंबईकरांचे पैसे खाल्ले कुणी? मुख्यमंत्र्यांच्या विशेष चौकशी समितीच्या स्थापनेमुळे येणार सत्य समोर

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेतील विविध विभागांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत विशेष चौकशी समिती स्थापन करण्यास मंजुरी दिल्याने भाजपचे आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. त्यामुळे मुंबईकरांचे पैसे खाल्ले कुणी ते आता मुंबईकर जनतेसमोर येऊन त्याचा पर्दाफाश होईल, असा विश्वास अमित साटम यांनी व्यक्त केला.

(हेही वाचा – बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील अनियमिततेची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी समिती)

आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मंजुरीनंतर प्रतिक्रिया देताना, माझ्या मागणीनंतर स्पेशल स्वॉडच्या ऑडीटच्या अहवालानंतर विशेष चौकशी समितीची स्थापना करण्याची मागणी केली. त्यानुसार ही समिती त्वरीत नेमली. त्यामुळे महापालिकेत जो भ्रष्टाचार कोणी केला आहे, त्याचा पर्दाफाश येणाऱ्या काळात होणार आहे. मला पूर्ण विश्वास आहे की आता ही चौकशी निष्पक्षपाती होणार आहे. मागील २५ वर्षे मुंबईला कुणी लुटले, मुंबईचा कोपरान कोपरा कुणी विकून खाल्ला, मुंबईकरांचे पैसे खाल्ले कुणी, ते आता मुंबईकर जनतेसमोर येईल, त्याचा पर्दाफाश होणार असा विश्वास अमित साटम यांनी व्यक्त केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.