…तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही; BJPचा काँग्रेसवर हल्लाबोल

74

गेल्या ६५ वर्षांत देशात हिंदूंची लोकसंख्या ८ टक्क्यांनी घटली, या कालावधीत देश काँग्रेसच्या हातात होता. पुढे जर काँग्रेसच्या हाती देश दिला, तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही, असा हल्लाबोल भाजपाच्या (BJP) आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक रिपोर्ट शेअर करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यातच, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचा (EAC-PM) एक अहवाल समोर आला आहे. यात, गेल्या 65 वर्षांत हिंदूंची लोकसंख्या जवळपास आठ टक्क्यांनी घटल्याचे म्हटले आहे. या अहवालावरून आता भाजपाने (BJP) काँग्रेसवर थेट निशाणा साधला आहे. 1950 ते 2015 दरम्यान हिंदूंचा वाटा 7.8% ने कमी झाला. तर मुस्लीम लोकसंख्या 43% ने वाढली. काँग्रेसच्या अनेक दशकांच्या राजवटीत आपल्यासोबत हेच केले. जर हा देश त्यांच्यासाठी सोडला, तर हिंदूंसाठी एकही देश उरणार नाही, असे अमित मालवीय म्हणाले.

(हेही वाचा संघ आणि विहिंपच्या नेत्यांची नावे घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला; Lt. Col. Purohit यांचा गौप्यस्फोट)

समान नागरी संहितेची आवश्यकता

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही वाढती मुस्लीम लोकसंख्या चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसच्या मुस्लीम तुष्टीकरणामुळे हे घडले आहे. ते मुस्लीम लीगप्रमाणे वागले आणि त्यामुळेच देशाने हा असमतोल पाहिला. यामुळे समान नागरी संहितेची (UCC) आवश्यकता आहे. या अहवालानुसार, 65 वर्षांत देशातील हिंदू लोकसंख्या 7.8 टक्क्यांनी घटली आहे. तर मुस्लीम लोकसंख्या 43 टक्क्यांनी वाढली आहे. हा काँग्रेसच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम आहे, असे मौर्य म्हणाले. (BJP)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.