Sunil Tatkare : ग्रामपंचायत निवडणूक अजित पवार यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब- खा.सुनील तटकरे यांचा दावा

68

राज्यातील जनतेनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावर पूर्णपणे विश्वास दाखवला आहे. दादांच्या नेतृत्वात राज्यातील बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाले आहेत. अनेक गावांत पक्षाचा झेंडा फडकला आहे.ग्रामपंचायत निवडणूक निकालावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयावर जनतेनेच शिक्कामोर्तबच केल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे यांनी सोमवारी विरोधकांना परखड शब्दात खडेबोल सुनावले. (Sunil Tatkare)

(हेही वाचा :Jogeshwari Vikhroli Metro Line : मेट्रो मार्गिकेचा अडसर दूर: ४५ बांधकामांवर कारवाई)

पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांचे योगदान किती मोठे आहे हे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो त्यांच्याशी संवाद साधला त्यावरून दिसून येतो.त्यामुळे माझ्या नेत्याचा अभिमान आम्हाला आहे असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. भाजपबरोबर गेलो म्हणजे आम्ही जातीयवादी झालो असा आरोप आता आमच्यावर करण्यात येतो.मात्र ज्यावेळी भाजपला पाठिंबा दिला त्यावेळी आम्ही जातीयवादी नव्हतो का? रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी भाजपसोबत जाण्यासाठी खुद्द शरद पवारांची भेट घेतली होती मग ते काय होते? अशी संतप्त विचारणाही तटकरे यांनी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.