आमदार देवेंद्र भुयार ‘प्रामाणिक’ ते खरं बोलताहेत; संजय राऊतांचे मोठे विधान

127

राज्यसभा निवडणुकीत दगाफटका केल्याचा आरोप ज्या आमदारांवर आहे ते देवेंद्र भुयार हे प्रामाणिक असून ते खरे बोलत असल्याचे, मोठे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. देवेंद्र भुयार यांनी आपल्या मनातील नाराजी बोलून दाखवली. त्यानंतर शरद पवार आणि संजय राऊतांचीही भेट घेतली. या भेटीदरम्यान, भुयारांची समजूत काढण्यात आली. संजय राऊत यांनी या भेटीबद्दलची प्रतिक्रिया सोमवारी पत्रकारांसमोर मांडली. भुयारांनी बोलून दाखवलेल्या भावना ख-या आहेत. त्यांच्या भावना आज मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचे, वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

राज्यसभा निवडणुकीत दगाबाजीचा आरोप असलेल्या देवेंद्र भुयारांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काम करण्याच्या पद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अपक्ष आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचताच येत नाही. याउलट उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोणत्याही आमदाराचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचे म्हणणे ऐकून घेतात, असे भुयारांनी म्हटले.

( हेही वाचा: अभिनेता शक्ती कपूर यांचा मुलगा बंगळुरु पोलिसांच्या ताब्यात! )

राऊतांनी दिले भुयारांना आश्वासन

देवेंद्र भुयारांची भेट घेतल्यानंतर, संजय राऊत यांनी त्यांच्या भावना समजून घेतल्या आणि त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन राऊतांना दिले. तसेच, मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही हे खरे आहे. कारण मुख्यमंत्र्यांशी थेट संपर्क होऊ शकत नसल्याचे राऊतांनी मान्य केले. पण यापुढे हा प्रकार होणार नाही , याची काळजी घेऊ असे आश्वासन राऊतांनी भुयारांना दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.