संजय राऊत म्हणतात; 10 बंडखोर आमदार पवारांसमोर बोलले

78

राज्यातील सत्तासंघर्ष सुरुच आहे. बंडखोरीनंतर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांचा गट शनिवारी राज्यपालांना पत्र देणार असल्याची माहीती मिळत आहे. शिंदे गटामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. यादरम्यान, आता 10 बंडखोर आमदार शरद पवार यांच्याशी बोलले असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.

ते लवकरच कळेल

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार शुक्रवारीही मातोश्रीवर आले होते. त्यांच्यासमोर आम्हाला तिथून दहा आमदारांनी फोन केले होते. त्यांनी सर्व परिस्थिती सांगितली आहे. या फ्लोअर टेस्टला सामोरे जा. कुणात किती दम आहे ते कळेल. संजय राऊत हवेत बोलत नाहीत. जे उद्धव ठाकरे सांगतात तेच मी सांगतो. आमच्याकडे कोणती ताकद आहे हे मला माहिती आहे, असेही संजय राऊत म्हणाले. हे 10 बंडखोर आमदार पवारांशी नेमके काय बोलले त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे लवकरच कळेल असे संजय पवार म्हणाले.

( हेही वाचा राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण काढले; एकनाथ शिंदेंचा सरकारवर हल्लाबोल )

फडणवीसांनी या झमेल्यात पडू नये

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकांचे सत्र सुरु असल्याबाबत विचारणा केली असता, संजय राऊत म्हणाले की, फडणवीसांनी या झमेल्यात पडू नये. ते राजकारणातले एक चांगले खेळाडू असले तरी या प्रकरणापासून त्यांनी दूरच राहावे, असा सल्ला देत त्यांनी अजित पवार आणि फडणवीस यांचा पहाटे झालेल्या शपथविधीचीही आठवण करुन दिली. मात्र, हा सल्ला देत असताना, त्यांच्याबद्दल आदर असल्याचे म्हणताच अनेकांच्या भूवया मात्र उंचावल्या होत्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.