UBT Group च्या बड्या नेत्याने घेतली भाजप मंत्र्यांची भेट; बंद दाराआड चर्चा

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय नाही, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली आहे. मंत्री रवींद्र चव्हाण आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

380
UBT Group च्या बड्या नेत्याने घेतली भाजप मंत्र्यांची भेट; बंद दाराआड चर्चा

मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (UBT Group) आमदार वैभव नाईक यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली आहे. वैभव नाईक आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली. नाईक आणि चव्हाण यांच्या भेटीमुळे चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान त्यानंतर लगेचच मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून या भेटीवर स्पष्टीकरण देखील देण्यात आलं आहे. (UBT Group)

वैभव नाईक यांनी रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीनंतर वैभव नाईक यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली. या भेटीवर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय नाही, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली आहे. मंत्री रवींद्र चव्हाण आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (UBT Group) आमदार वैभव नाईक यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. (UBT Group)

(हेही वाचा – Skoda Octavia RS iV : स्कोडा ऑक्टेविया गाडीला मिळालंय फेसलिफ्ट)

मी पक्ष सोडून आजही जात नाही, उद्याही नाही आणि परवाही जाणार नाही – वैभव नाईक

गेल्या २ वर्षांपासून आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) आहोत. त्यामुळेच आमच्यावर अनेक कारवाई चालू आहेत. ४ दिवसांपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा (Uddhav Thackeray) सिंधुदुर्ग दौरा झाला त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. खर तर काल आम्ही शासकीय अधिकाऱ्यांच्या समोर रविंद्र चव्हाण यांचं नियोजित दौरा शासकीय विश्रामगृहावर त्यांना निवेदन दिले. त्यांनी आम्हाला काही बदल सूचवण्यासाठी थांबवले आणि ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत म्हणून भेटलो. ज्या लोकांना भीती आणि आमिष देऊन सुद्धा येत नाही त्यांचं असं नाव खराब करायचा प्रयत्न करतात. आम्ही पक्ष सोडून आजही जात नाही, उद्याही नाही आणि परवाही जाणार नाही, असे वैभव नाईक म्हणाले. (UBT Group)

ठाकरे गटाचे (UBT Group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कोकण दौऱ्यानंतर मोठा द्विस्ट निर्माण होण्याची शक्यता असून त्यांचे कट्टर समर्थक आमदार वैभव नाईक यांनी भाजप नेते तथा मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. वैभव नाईक आणि रवींद्र चव्हाण या उभयतांमधील भेटीमुळे कोकणच्या राजकारणात उलट सुलट चर्चांना सुरूवात झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) दौऱ्यानंतर शिवसेना नेते उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांतच ठाकरे यांच्या व्यासपीठावरील लोकप्रतिनिधी आमच्याकडे येतील, असं मोठे विधान केलं होतं. त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. (UBT Group)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.