Rajya Sabha Election अखेर बिनविरोध; सहा जागांसाठी सहा अर्ज दाखल

सह्या नसल्याने अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद ठरणार

258
Rajya Sabha Election अखेर बिनविरोध; सहा जागांसाठी सहा अर्ज दाखल
Rajya Sabha Election अखेर बिनविरोध; सहा जागांसाठी सहा अर्ज दाखल

राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) उमेदवारी अर्ज भरण्याच्या गुरुवारच्या शेवटच्या दिवशी सहा जागांसाठी सहा प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. त्यामुळे राज्यसभा निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यसभेसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी उद्या, शुक्रवारी (१६ फेब्रुवारी) होणार आहे. या छाननीनंतर राज्यसभा निवडणूक बिनविरोध पार पडल्याचे जाहीर होईल. (Rajya Sabha Election)

राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) येत्या २७ फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांच्या मतदानाद्वारे सहा सदस्य राज्यसभेवर निवडून द्यायचे आहेत. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी भाजपकडून (BJP) अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे, शिवसेनेकडून मिलिंद देवरा, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांनी गुरुवारी आपले अर्ज दाखल केले. तर एका हौशी उमेदवाराने अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आमदारांच्या सह्या नसल्याने हा अर्ज बाद ठरणार आहे. (Rajya Sabha Election)

(हेही वाचा – Elephanta Caves : घारापुरी येथे हिंदुत्वनिष्ठांनी केली शिवलिंगाची पूजा)

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपने त्यांना राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्यामुळे काँग्रेसमधील अशोक चव्हाण समर्थक आमदार राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) भाजपच्या बाजूने मतदान करू शकतील, अशी शक्यता व्यक्त होत होती. भाजप शेवटच्या क्षणी चौथा उमेदवार देऊन काँग्रेसची चिंता वाढवेल, असे बोलले जात होते. मात्र, भाजपने अधिकृत तीन उमेदवार कायम ठेवल्याने राज्यसभा निवडणूक टळली आहे. त्यामुळे सर्व सहाही उमेदवारांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Rajya Sabha Election)

राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Election) बिनविरोध होणार असल्याने आपल्या राजकीय वाटचालीत सातत्याने लोकसभा आणि विधानसभेत नांदेडचे प्रतिनिधित्व करणारे अशोक चव्हाण हे प्रथमच संसदेत ज्येष्ठांच्या सभागृहात बसणार आहेत. याशिवाय मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे, मिलिंद देवरा आणि काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पहिल्यांदा राज्यसभेत पाय ठेवणार आहेत. सध्या राज्यसभेचे सदस्य असलेले प्रफुल्ल पटेल पुन्हा राज्यसभेवर निवडून जाणार आहेत. (Rajya Sabha Election)

(हेही वाचा – Maharashtra Cyber ​​Cell : सरकारी पत्रव्यवहारांसाठी सरकारी अधिकृत संकेतस्थळाचा वापर करा; महाराष्ट्र सायबर सेलकडून सरकारला प्रस्ताव)

पक्षाच्या नेत्यांची उपस्थिती

दरम्यान, महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करतेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar) तसेच राज्यमंत्रिमंडळातील सहकारी उपस्थित होते. तर चंद्रकांत हंडोरे यांचा अर्ज भरताना विधिमंडळ पक्षनेते बाळसाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते अजय चौधरी आदी उपस्थित होते. (Rajya Sabha Election)

काही गोष्टी गुलदस्त्यात राहू द्या : पटेल

दरम्यान, राज्यसभेचे सदस्य असताना मी पुन्हा राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) उमेदवारी अर्ज दाखल केल्याने वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. त्यामुळे काही गोष्टी गुलदस्त्यात राहू द्या. आतापर्यंतच्या राजकीय जीवनात आम्ही काही शिकलो आहोत. राज्यसभा उमेदवारीसाठी आमच्या पक्षात अनेक जण इच्छुक होते. माझ्या राजीनाम्यानंतर रिक्त होणारी राज्यसभेची पोटनिवडणूक होईल आणि महाविकास आघाडीत ही पोटनिवडणूक आम्हीच लढू. त्यावेळी तुम्हाला काही गोष्टी स्पष्ट होतील, असे प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. (Rajya Sabha Election)

दरम्यान, प्रफुल्ल पटेल पुन्हा सहा वर्षासाठी राज्यसभेवर निवडून गेल्यानंतर पटेल यांच्या जागेसाठी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पोटनिवडणूक अपेक्षित आहे. त्यावेळी अजित पवार यांच्याकडून लोकसभेची उमेदवारी न मिळालेल्या किंवा लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराला संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. (Rajya Sabha Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.