जितेंद्र आव्हाडांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; जामिनासाठी प्रयत्न

150

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ठाण्यातल्या विवियाना मॉलमधील मारहान प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. याचप्रकरणी आता आव्हाडांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान कोठडी सुनावताच आव्हाडांनी जामिनासाठी अर्ज केल्याची माहिती मिळाली आहे.

( हेही वाचा : पुणे तिथे काय उणे! PMPML बसचा थेट Google सोबत करार; प्रवाशांना मिळणार ‘या’ नव्या सुविधा )

न्यायालयाने कोठडी सुनावल्यावर आता जितेंद्र आव्हाड यांच्या वकिलांकडून त्यांना जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणी वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला असून त्यावर आता सुनावणी करण्यात येणार आहे.

काय आहे प्रकरण?

ठाण्यातील विवियाना मॉलमधील सिनेपोलिस चित्रपटगृहात सोमवारी रात्री हर हर महादेव चित्रपटाचा शो सुरू होता. शो सुरू असताना, जितेंद्र आव्हाड कार्यकर्त्यांसोबत चित्रपटगृहात गेले आणि त्यांनी चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप करत शो बंद केला. तसेच चित्रपटगृहातील प्रेक्षकांना निघून जाण्यास सांगितले. जमावातील काही जणांनी मारहाण केल्याची तक्रार चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या ठाण्यातील व्यावसायिक परीक्षित दुर्वे यांनी केली होती. यानंतर शो बंद पडल्याचे समजल्यानंतर त्याठिकाणी मनसे नेते अविनाश जाधव पोहोचले, त्यांना हा शो पुन्हा सुरू केला.

तक्रारीनंतर आव्हाड यांच्यासह १०० कार्यकर्त्यांविरुद्ध वर्तकनगर पोलिस ठाण्यात विविध कलमाखाली गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आव्हाडांना शुक्रवारी बोलवण्यात आले होते. त्यानंतर दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी आव्हाड, आनंद परांजपे यांच्यासह ११ जणांना अटक करण्यात आली.

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.