महामार्गांवर अपघात होण्यामागे ‘रस्ता संमोहन’ महत्वाचे कारण!

141

स्व. विनायक मेटे यांच्या गाडीला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पहाटे ५ वाजता अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. संशोधनानुसार महामार्गावर पहाटे ४ वाजल्यानंतर अधिक अपघात होतात, कारण रात्रभर वाहन चालवून चालकाला पहाटेच्या वेळी झोप अनावर होत असल्याने अपघात होतात. मात्र अपघात होण्यामागील आणखी एक महत्त्वाचे कारण समोर आले आहे. ते म्हणजे रोड हिप्नोसिस अर्थात रस्ता संमोहन! हे रस्ता संमोहन म्हणजे काय आणि त्यापासून वाचण्यासाठी काय उपाय आहेत, हे जाणून घेऊया!

काय आहे रोड संमोहन?

  • रोड संमोहन ही एक मानसिक स्थिती आहे. या स्थितीतून सर्वच चालक जात असतात.
  • या अवस्थेबाबत अद्याप जनजागृती झाली नसल्याने बहुतेक चालक अनभिज्ञ आहेत.
  • रोड संमोहन हे वाहन रस्त्यावर उतरवल्यानंतर पुढील २.५ तासांनी सुरू होते.
  • या अवस्थेत संमोहित चालकाचे डोळे उघडे असतात, परंतु मेंदू जे काही पाहतो ते रेकॉर्ड आणि विश्लेषण करत नाही.
  • रोड संमोहन हे तुमच्या समोर उभ्या असलेल्या वाहनाला किंवा ट्रकला मागील बाजूस अपघात होण्याचे पहिले कारण आहे.
  • रोड हिप्नोसिस असलेल्या ड्रायव्हरला टक्कर होईपर्यंत शेवटच्या १५ मिनिटांत काहीही आठवत नाही.
  • समोरचे वाहन किती किमी वेगाने जात आहे हे लक्षात येत नाही.
  • लांब रस्त्यावर रोड संमोहनापूर्वी काही काळ चलचित्र बघितल्यासारखे वाटून चालक नुसते बघत राहतो.

(हेही वाचा गुलाब पाटलांना खडसावल्याबद्दल उद्धव ठाकरेंकडून नीलम गोऱ्हेंचे कौतुक)

रोड संमोहनापासून कसे वाचाल?

  • रोड संमोहनापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, दर २.५ तासांनी थांबणे, चालणे, चहा किंवा कॉफी पिणे आवश्यक आहे.
  • वाहन चालवताना काही ठिकाणे आणि वाहने लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
  • जर तुम्हाला शेवटच्या १५ मिनिटांत काहीही आठवत नसेल, तर याचा अर्थ तुम्ही रोड संमोहित झाला आहात हे नक्की.
  • रोड संमोहन रात्रीच्या वेळी अधिक वेळा घडते आणि प्रवासी देखील झोपलेले असल्यास, परिस्थिती खूप गंभीर होते.
  • चालकाने थांबावे, विश्रांती घ्यावी, दर २.५ तासांनी ५-६ मिनिटे चालावे आणि आपले मन मोकळे ठेवावे.
  • डोळे उघडे असले तरी जर मन बंद असेल तर अपघात अटळ आहे.
  • गाडी चालवतांना शून्यात जात असाल, तर तत्काळ गाडी बाजूला घेऊन दीर्घ श्वास घ्या. फ्रेश होऊन इकडे तिकडे बघत परत उत्साहात गाडी सुरु करा.

अपघात होण्यामागील कारणे

  • वेग मर्यादेचे उल्लंघन.
  • वाहने ब्रेकडाऊन होणे.
  • लेन कटिंग करणे.
  • बेकायदा ओव्हरटेक करणे.
  • अतिवेगामुळे वाहनांचे टायर फुटणे.

अपघात रोखण्यासाठी उपाय

  • वाहतूक नियमांचे पालन करणे.
  • चालकांसाठी सूचना फलक रेडियमचे असावेत.
  • बंद पडलेली वाहने उभी करण्यासाठी सर्व्हिस लेन निर्माण करणे.
  • लेनचे काटेकोरपणे पालन करणे.

(हेही वाचा विरोधकांशिवाय सुरू आहे पावसाळी अधिवेशन!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.