झोपलेलं सरकार जागं होऊ दे, जनतेचा पाडवा गोड होऊ दे…

75

झोपलेलं सरकार जागं होऊ दे, जनतेचा पाडवा गोड होऊ दे…, अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी मंगळवारी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली.

( हेही वाचा : २५ वर्षांपूर्वी झालेल्या खुनाचा घेतला सूड! भररस्त्यात बांधकाम व्यवसायिकावर झाडल्या गोळ्या, चौघांना अटक)

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा मंगळवारी, २१ मार्चला पंधरावा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत जोरदार निदर्शने केली.

बळीराजाला मदत करा नाहीतर खुर्च्या खाली करा… ईडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे… उद्योग चालले बाहेर, वाढती बेरोजगारी… सरकारा गुढी घरी उभारु का शेजारी?… वाढवला गॅस, महागाई केवढी… अवकाळी पाऊस, विस्कटली घडी… सरकारा कशी करु खरेदी? कशी उभारु गुढी?… अशा घोषणा देत आणि बॅनर फडकवून व हातात गुढी घेऊन महागाई, अवकाळी पाऊस, या विषयावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकार विरोधात हल्लाबोल केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.