नागरिकांना बदनाम करण्यासाठी एनसीबीचा गैरवापर!

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील दापोली येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

69

नवाब मलिक हे एनसीबीच्या विरोधात पुराव्यानिशी बोलत आहेत. नागरिकांना छळण्यासाठी…बदनाम करण्यासाठी व नागरिकांना अनेक दिवस तुरुंगात ठेवण्यासाठी एनसीबीचा वापर होतोय, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दापोली येथे पत्रकार परिषदेत केला.

नवाब मलिक हे सत्य गोष्टी समोर आणत आहेत!

शाहरुख खानच्या मुलाच्या बाबतीत घडले, ते आणखी इतरांच्या बाबतीतही झाले असेल, त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली. एनसीबीची टीम वानखेडेच्या चौकशीसाठी आली. वानखेडेची चौकशी करतेय. वानखेडे याने घेतलेला दाखला व IRS मध्ये जो प्रवेश घेतला, तो कोणत्या जातीच्या आधारावर घेतला याचा खुलासा होईल आणि फसवणूक कुणी केली व कशी केली याचा खुलासादेखील लवकरच होईल. चौकशीसाठी आलेली एनसीबीची टीम ख-या गोष्टींची चौकशी करेल. त्यामुळे ही टिम चुकांवर पांघरूण घालण्यासाठी आली नसावी, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. नवाब मलिक हे सत्य गोष्टी समोर आणत आहेत, त्या सत्य आहेत. केंद्राच्या या यंत्रणा चुका करुन दिशाभूल करत आहेत. या यंत्रणांचा वापर करून नागरिकांना छळण्याचा प्रकार होतो आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

(हेही वाचा : गोसावी म्हणतो, मी मराठी असल्याने माझ्या पाठिशी राहा!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.