राज ठाकरेंवर राजद्रोहाचा गुन्हा का नाही? जलील ओततायत आगीत तेल

98

औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर राज्यात खळबळ उडालेली असतानाच आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे भाऊ असल्यामुळे त्यांच्यावर सौम्य कलमं लावण्यात आल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरुन इम्तियाज जलील हे आगीत तेल ओकण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचाः राज ठाकरे हिंदीत बोलले आणि सर्व हसायला लागले)

जलील यांचा सवाल

राज ठाकरे यांच्यावर कलम, 116,117 आणि 153 अंतर्गत औरंगाबाद येथील सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे हे आपले भाऊ असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला लावला नाही, अशी शंका माझ्या मनात येते. राणा दाम्पत्यावर असा गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो मग राज ठाकरेंवर का नाही, असा सवाल इम्तियाज जलील यांनी केला आहे.

(हेही वाचाः ‘या’ मशिदींवर कारवाई कधी होणार? राज ठाकरेंनी सांगितली आकडेवारी)

इतरांप्रमाणेच कारवाई करावी

राज्य सरकारमधील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र चर्चा करुन हा निर्णय घेतला आहे. आपल्याला पुढे राज ठाकरे यांच्यासोबत जावं लागेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसला वाटतं म्हणून त्यांच्यावर कारवाई करताना त्यांनी हात आखडता घेतला का, असा प्रश्नही यावेळी जलील यांनी उपस्थित केला. त्यामुळे थातुरमातुर कलमं लावण्यापेक्षा त्यांनी इतरांप्रमाणेच राज ठाकरे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी जलील यांनी केली आहे.

(हेही वाचाः राज ठाकरेंनी शेअर केला बाळासाहेबांचा व्हिडिओ, भोंग्यांबाबत काय म्हणाले होते बाळासाहेब?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.