Manoj Jarange Patil : फडणवीसांवर गंभीर आरोप करत मनोज जरांगे पाटील निघाले सागर बंगल्याकडे

370
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) अंतरवाली सराटीमध्ये प्रचंड आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत असून, त्यांना माझा बळी हवा आहे, असा आरोप जरांगे यांनी केला आहे. तसेच मी आता फडणवीसांच्या सागर बंगल्यासमोर जाणार असून, माझा जीव घ्या असे म्हणत मनोज जरांगे थेट व्यासपीठावरून खाली उतरले. मला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा म्हणत जरांगे प्रचंड आक्रमक झाले. जरांगे यांची आक्रमक भूमिका पाहता गावकऱ्यांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच जरांगे यांना थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सध्या आंतरवाली सराटीमध्ये प्रचंड गोंधळाचा वातावरण पाहायला मिळत आहे.

सलाईनमधून विष देऊन मारण्याचा प्रयत्न 

”मराठ्यांचा दरारा संपवण्याचे फडणवीसांचे लक्ष आहे. शिंदेंचे यामध्ये काही लोक असून अजित पवारांचेही दोन आमदार यामध्ये सामील आहेत. ओबीसीतून आरक्षण द्यायचे नाही, सगेसोगरेतून आरक्षण द्यायचे नाही, 10 टक्के आरक्षण मराठ्यांवर लादायचे पण हे पोरगं (जरांगे) ऐकतंच नाही. हे पोरगं संपले पाहिजे, नाहीतर त्याचा गेम तरी करावा लागेल, नसता याला बदनाम तरी करावा लागेल, नाहीतर याला उपोषणात तरी मरु द्यावं लागेल. याला सलाईनमधून विष देऊन तरी मारावं लागेल, असा यांचा विचार आहे. म्हणून मी सलाईन देखील बंद केली, असे म्हणत जरांगेंनी (Manoj Jarange Patil) गंभीर आरोप केले आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.