Mahayuti : ‘विकसित मुंबई ते विकसित भारत’ राहुल शेवाळे यांची महायुतीच्या निर्धार मेळाव्यात घोषणा

246

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी मुंबईच्या विकास आराखड्याची संपूर्ण अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. म्हणूनच विकसित मुंबई ते विकसित भारत ही घोषणा महायुतीचे (Mahayuti) मुंबई दक्षिण – मध्य चे उमेदवार राहुल शेवाळे यांनी केली. रविवारी, 7 एप्रिल रोजी दुपारी दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे आयोजित केलेल्या महायुतीच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी आमदार सदा सरवणकर, आमदार प्रसाद लाड, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर, शिवसेना विभागप्रमुख निशिकांत पाठारे, महिला विभागप्रमुख प्रिया गुरव, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय डोळसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, भाजपा विधानसभा अध्यक्षा अक्षता तेंडुलकर, आरपीआय युवा अध्यक्ष सचिन मोहिते, माजी नगरसेवक समाधान सरवणकर, अमेय घोले, शीतल गंभीर, अन्य मान्यवर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने महायुतीचे (Mahayuti) कार्यकर्ते उपस्थित होते.

(हेही वाचा Pakistan : संरक्षणमंत्र्यांच्या विधानावर पाकचा थयथयाट; म्हणे, भारताला बेकायदेशीर कारवायांसाठी जबाबदार धरणे आवश्यक)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघात माहीम येथे आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या (Mahayuti) निर्धार मेळाव्यात बोलताना उमेदवार राहुल शेवाळे यांनी मुंबई विकास आराखडा 2024 च्या अंमलबजावणीची आवश्यकता यावर प्रकाश टाकला. तसेच विकसित भारतासाठी विकसित मुंबईचे योगदान विषद केले. आमदार प्रसाद लाड यांनी महायुतीच्या (Mahayuti) सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह घराघरात पोहोचविण्याचे आवाहन केले. सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या उदंड प्रतिसादात महायुतीचा निर्धार मेळावा यशस्वीपणे पार पडला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.