छत्रपतींच्या पाठित खंजिर खुपसणा-यांनाही महाराष्ट्राने माफ केले नाही; राऊतांनी विरोधकांना सुनावले

76

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे काय तुमची खासगी प्राॅपर्टी आहेत का? उद्या छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचाही फोटो वापरण्यास मनाई केली, तर कसे होईल? असा सवाल संजय शिरसाट यांनी केला होता. त्यावर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. ते माध्यमांशी बोलत होते. छत्रपतींच्या पाठीत खंजीर खुपसणा-यांना महाराष्ट्राने कधी माफ केले नाही. छत्रपतींबाबतही विश्वासघाताचे राजकारण झाले. त्याची आठवण आजही महाराष्ट्राने ठेवली आहे. हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा टोला राऊतांनी विरोधकांना लगावला आहे.

( हेही वाचा: सीएसएमटी स्थानकात अपघात; लोकलचा एक डब्बा रुळावरुन घसरला,रेल्वे सेवा विस्कळीत )

गळलेल्या पानातून पालवी फुटत नाही

बाळासाहेबांच्या चरणावर लीन होण्याऐवजी बाळासाहेबांचे चरणच यांनी ओढले, असा हल्लाबोल राऊतांनी केला आहे. गळलेल्या पानातून पालवी फुटत नाही, जे झाड असते त्याला पालवी फुटते. त्यांनी जीवशास्त्राचा थोडा अभ्यास करायला हवा. भुगोलाचा, भौतिकशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे. महाराष्ट्र महाप्रलय आहे. त्यात अनेक ओंडकेही वाहून गेले आहेत. त्यामुळे त्यांचे लक्ष ओंडक्याकडे आहे. आमचे लक्ष जी झाडे महापुरात सुद्धा रुजून आहेत, त्याकडे आहे. आम्ही त्यापैकी एक आहोत, असे राऊत म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.