Lok Sabha Election 2024 : आघाडी आणि महायुतीमध्ये काही जागांवरून अजूनही तणाव

महाविकास आघाडीत सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई या तीन मतदारसंघांवरून निर्माण झालेला तिढा कायम आहे. सांगलीची जागा कोणत्याही परिस्थितीत मिळालीच पाहिजे, असा काँग्रेस नेत्यांचा आग्रह असला तरी शिवसेना माघार घेण्यास तयार नाही.

87
Lok Sabha Election 2024 : दिल्लीत ५ वर्षांत ३० टक्क्यांनी बेघर मतदार वाढले

देशभरात लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपत आली तरीही महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपावरून सुरू झालेली रस्सीखेच संपण्याचे अजून नाव दिसत नाही. ठाणे, सातारा, नाशिक या जागांवरून महायुतीत तर सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघांवरून महाविकास आघाडीत तुटेपर्यंत ताणले गेले आहे. या घडामोडींमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर मित्रपक्ष तसेच स्वपक्षीय खासदार असा दुहेरी दबाव आला आहे. या अस्वस्थेपायीच महायुती किंवा महाविकास आघाडीला अद्याप जागावाटपांची अधिकृतपणे घोषणा करता आलेली नाही. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Sheikh Hasina : विरोधक भारतीय मसाल्यांशिवाय खाऊ शकतात का; Boycott India मोहिमेवर बांगलादेशच्या पंतप्रधान संतप्त)

काही जागांवर महाविकास आघाडीतही होत नाही सहमती…

महाविकास आघाडीत सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई या तीन मतदारसंघांवरून निर्माण झालेला तिढा कायम आहे. सांगलीची जागा कोणत्याही परिस्थितीत मिळालीच पाहिजे, असा काँग्रेस नेत्यांचा आग्रह असला तरी शिवसेना माघार घेण्यास तयार नाही. मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव विश्वजित कदम व अन्य काँग्रेस नेत्यांनी मांडला असला तरी दिल्लीतील नेत्यांची त्याला अजून तरी मान्यता नाही. भिवंडीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील तिढा सुटू शकलेला नाही. दक्षिण मध्य मुंबईची जागा मिळावी ही काँग्रेसची मागणी असली तरी शिवसेनेने सांगलीच्या जागेवरील दावा मागे घ्या मग बघू, अशी भूमिका घेतली आहे. एकूणच महाविकास आघाडीतही अद्याप सहमती होऊ शकलेली नाही. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.