स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर काश्मिरी पंडिताची दहशतवाद्यांकडून हत्या

83

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर मंगळवारी काश्मीर खो-यात एक दुःखद घटना घडली आहे. शोपियां येथील छोटीपुरा परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी झालेली व्यक्ती आणि मृत व्यक्ती हे दोघे जण सख्खे भाऊ असून काश्मिरी पंडित असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला असून जनता संतप्त आहे.

काश्मिरी पंडितांची हत्या

मृत व्यक्तीचे नाव सुनील कुमार भट्ट असून जखमीचे नाव पिंटू कुमार भट्ट आहे. छोटीपुरा परिसरात असलेल्या सफरचंदाच्या बागेत हे दोघे भाऊ जात होते. त्यावेळी हल्ला करणा-या दहशतवाद्यांनी त्यांना त्यांचं नाव विचारलं. या दोघांनी आपली नावे सांगताच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात सुनील कुमार यांचा मृत्यू झाला असून पिंटू हे गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान पिंटू यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

भाजपकडून हल्ल्याचा निषेध

या हल्ल्याचा भाजप नेते निर्मल सिंह यांनी निषेध केला आहे. हा एक भ्याड हल्ला असून, निष्पाप लोकांचा बळी घेण्याचे काम दहशतवादी करत आहेत. पण त्यांनी असे हल्ले करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यांना जनतेच्या मनात दहशत निर्माण करता येणार नाही, असे देखील निर्मल सिंह यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.