Giriraj Singh : भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा काँग्रेसचा डाव; केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्याकडून काँग्रेसचा समाचार 

79
Giriraj Singh : भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा काँग्रेसचा डाव; केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्याकडून काँग्रेसचा समाचार 
Giriraj Singh : भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा काँग्रेसचा डाव; केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्याकडून काँग्रेसचा समाचार 
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सल्लागार मंडळाचा मुस्लिमांची संख्या वाढली असल्याचा अहवाल वाचल्यानंतर देशवासियांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. हिंदुची संख्या घटली आणि मुस्लिमांची संख्या वाढली असे या अहवालात म्हटले आहे. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह (Giriraj Singh) यांनी या परिस्थितिला काँग्रेस जबाबदार असल्याचे सांगत काँग्रेसचा चांगला समाचार घेतला आहे. (Giriraj Singh)
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग (Giriraj Singh) यांनी तुष्टीकरणाचे राजकारण करणाऱ्या काँग्रेसला (Congress) आज चांगलेच धारेवर धरले. पंतप्रधानाच्या सल्लागार मंडळाचा आज एक अहवाल जाहीर झाला आहे. यानुसार देशात हिंदू लोकसंख्या कमी झाली आहे, तर मुस्लिम लोकसंख्या वाढली आहे.  काँग्रेसने (Congress) या देशाला धर्मशाळेत रूपांतरित केले आहे, असा आरोप सिंग यांनी लावला आहे. (Giriraj Singh)
 केंद्रीय मंत्री आणि बेगुसराय येथील भाजपाचे (BJP) उमेदवार गिरिराज सिंह (Giriraj Singh) त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आज गुरुवारी (9 मे) प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गिरीराज सिंह (Giriraj Singh) यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पराभूत करण्यासाठी देशभरात व्होट जिहाद सुरू करण्यात आला असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की, देशात पूर्वी लव्ह जिहाद केला जात होता, त्याचे आता व्होट जिहादमध्ये रूपांतर झाले आहे. (Giriraj Singh)
 गिरीराज सिंह (Giriraj Singh) म्हणाले की, देशात हिंदूची लोकसंख्या कमी झाली आहे, तर मुस्लिम लोकसंख्या वाढली आहे. मुस्लिम लोकसंख्या 20% झाली आहे, काँग्रेसने देशाला धर्मशाळा बनवले आहे.’  (Giriraj Singh)
 सिंग पुढे म्हणाले की, 1971 साली बांगलादेशातून आलेल्या लोकांसाठी या देशाला कुरण बनवण्यात आले आणि नंतर त्यांचे व्होट बँकमध्ये रूपांतर करण्यात आले. गिरीराज सिंह (Giriraj Singh) पुढे म्हणाले की, देशातून सनातन धर्म संपवणे हे काँग्रेसचे उद्दिष्ट असून मुस्लिमांना मागच्या दाराने आरक्षण दिले जात आहे. (Giriraj Singh)
मुस्लिमांचा प्रजनन दर हिंदूंपेक्षा 1.25% जास्त 
प्रसारमाध्यमांशी बोलताना गिरीराज सिंह म्हणाले की, मुस्लिमांचा प्रजनन दर हिंदूंच्या तुलनेत 1.25% अधिक आहे. यावरून स्पष्टपणे दिसून येते की भारताला इस्लामिक राज्य बनवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. भारत सरकारच्या मते, 1950 मध्ये भारतीय लोकसंख्येमध्ये हिंदू लोकसंख्येचा वाटा 84% होता, जो आता 78% झाला आहे. 65 वर्षांपूर्वी मुस्लिमांची संख्या 9.84% होती, जी आता 14.09% झाली आहे. (Giriraj Singh)
गिरीराज सिंह यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली
प्रसारमाध्यमांसोबत आकडेवारी शेअर करताना गिरीराज सिंह (Giriraj Singh) म्हणाले की, हे आकडे तांत्रिक आहेत आणि काँग्रेसने 1947 नंतर तुष्टीकरणाचे धोरण स्वीकारले आहे. पूर्वी लोकसंख्या 88% होती, आता ती 70% आहे, तर तांत्रिक आकडेवारी 79% आहे. हा अहवाल चिंताजनक असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, देशातील 150 जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती दुर्दैवी असून धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली तुष्टीकरणाचे राजकारण सुरू आहे. (Giriraj Singh)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.