Dhananjay Munde : 2410 प्रतिक्विंटल कांद्याचा दर ऐतिहासिक; धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची हमी दिली

78
Dhananjay Munde : 2410 प्रतिक्विंटल कांद्याचा दर ऐतिहासिक; धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले

सरकार (Dhananjay Munde) महाराष्ट्रातून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे. तसेच त्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे दोन खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. केंद्र सरकार 2410 प्रतिक्विंटल या दराने कांदा खरेदी करेल हा आजपर्यंतचा विक्रमी दर असल्याचा दावा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज (मंगळवार 22 ऑगस्ट) पत्रकारांसोबत बोलताना केला.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतल्यानंतर मुंडे (Dhananjay Munde) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार अतुल बेनके उपस्थित होते. ते म्हणाले राज्य सरकार शेतकऱ्यांसॊबत आहे. यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून कांद्याचे दर नियंत्रित करण्यासाठी वारंवार दूरध्वनी केले. तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील व्यस्त कार्यक्रमा मधून वेळ काढून केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. राज्य सरकार समन्वय साधून काम करीत आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधानांचे देखील आभार व्यक्त केले.

(हेही वाचा – Onion News Update : केंद्र सरकार दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार, नाशिकसह अहमदनगरमध्ये खरेदी केंद्र)

मात्र कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी थोडा सुखावला होता. त्यातच केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर शुल्क लावण्याने शेतकऱ्यांनी नारजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या आंदोलनाच्या पवित्रात आहेत. अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये काद्यांचे लिलाव सध्या बंद पाडण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला महाराष्ट्रातील (Dhananjay Munde) शेतकऱ्यांच्या भावना सांगण्यासाठी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात राज्य सरकारला यश आले आहे.

आंदोलन मागे घेण्याची मागणी

कांदा उत्पादक शेतकरी राज्यात आंदोलन करत आहे. आता केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. केंद्र सरकारचा निर्णय समाधानकारक असल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन करू नये, असे आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केले आहे.

सरकार महाराष्ट्रातून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे. तसेच त्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे दोन खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. केंद्र सरकार 2410 प्रतिक्विंटल या दराने कांदा खरेदी करेल हा आजपर्यंतचा विक्रमी दर असल्याचा दावा धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.