Savarkar’s portrait unveiled in Karnataka Assembly : काँग्रेसला कर्नाटक विधानसभा संसदेपेक्षा मोठी वाटते का?

85

देशाला स्वातंत्र्य हे चरखा आणि अहिंसेच्या माध्यमातून मिळाले, असे सांगत काँग्रेसने कायम स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला नाकारले आहे. त्यामुळे काँग्रेस कायम सशस्त्र क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान राहिलेले वीर सावरकर यांचा सन्मान होत असेल तर त्याविरोधात गरळ ओकत असते. काँग्रेसचा हा सावरकर द्वेष पुन्हा एकदा समोर आला आहे. कर्नाटक विधानसभेत वीर सावरकर यांचे तैलचित्र लावल्यामुळे काँग्रेसने त्याला विरोध करून सावरकर द्वेष दाखवून दिला आहे.

विशेष म्हणजे वाजपेयी सरकार असताना २६ फेब्रुवारी २००३ रोजी संसदेत वीर सावरकर यांचे तैलचित्र लावण्यात आले. त्यानंतर २८ मे २००३ रोजी गुजरात विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चित्र लावण्यात आले. नंतर महाराष्ट्राच्या विधानसभेतही वीर सावरकर यांचे तैलचित्र लावून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सन्मान करण्यात आला. असे असताना कर्नाटक काँग्रेसला मात्र कर्नाटक विधानसभेत वीर सावरकर यांचे तैलचित्र लावणे पटत नाही, त्यामुळे कर्नाटक काँग्रेसला कर्नाटक विधानसभा संसदेपेक्षा मोठी आहे, असे वाटते का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

(हेही वाचा कर्नाटकाच्या विधानसभेत वीर सावरकरांचे तैलचित्र लावल्याने काँग्रेसला पोटशूळ!)

कर्नाटक हिंदुत्वाचे केंद्रबिंदू! 

सध्या कर्नाटक हे प्रखर हिंदुत्वाचे केंद्रस्थान बनले आहे. या राज्यातून शाळा-महाविद्यालयांत मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब घालून येण्यास विरोध करण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव निर्माण होत आहे, असा सूर उत्पन्न झाला होता. आता कर्नाटकाच्या हिवाळी अधिवेशनात हलाल विरोधात विधेयक मांडले जाणार आहे. देशात मुसलमानांची समांतर अर्थव्यवस्था उभी करण्याचे जे कारस्थान सुरु आहे, त्याला यामधून छेद देण्याचा प्रयत्न होणार आहे. याच अधिवेशनाच्या सुरुवातीला प्रखर हिंदुत्वाचे पुरस्कर्ते वीर सावरकर यांचे कर्नाटक विधानसभेत तैलचित्र लावले. त्यामुळे आता काँग्रेसचा तिळपापड झाला आहे.

काय आहे प्रकरण? 

कर्नाटक विधानसभेच्या सभागृहात वीर सावरकरांचे तैलचित्र लावल्यामुळे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि इतर काँग्रेस आमदारांनी विधानसभेबाहेर निदर्शने केली. कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख आणि आमदार डीके शिवकुमार यांनी वीर सावरकर यांचे विधानसभेच्या सभागृहात तैलचित्र लावण्यास विरोध करत सत्ताधारी भाजप सरकारला विधानसभेचे कामकाज चालू द्यायचे नाही, म्हणून त्यांनी हा खटाटोप केला आहे, असा आरोप केला. विरोधीपक्ष काँग्रेस हा सरकारच्या विरोधात भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे उपस्थित करणार आहे. सरकारकडे विकासाचा कोणताही अजेंडा नाही. त्यामुळे त्यांनी हा प्रकार केला आहे, असे सिद्धरामय्या म्हणाले. वीर सावरकर हे वादग्रस्त व्यक्तिमत्व होते, मग त्यांचा आदर का केला जात आहे, असे म्हणत सावरकर द्वेष करण्याचा प्रयत्न केला आहे.

(हेही वाचा अंदमानातील काळ्या पाण्याची शिक्षा आणि दुर्दम्य इच्छाशक्ती)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.