जनतेला केव्हा, कोणत्या वेळेत भेटणार ते फलकावर लिहा! महिलेच्या आत्महत्येनंतर मुख्यमंत्र्यांचे निर्देश

62

कामानिमित्त मंत्रालयात आलेल्या ३ नागरिकांनी सोमवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. तसेच मंगळवारी एका महिलेने मंत्रालयात विषप्राशन केल्याने तिचा मृत्यू झाला. यानंतर आता राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

( हेही वाचा : नवी मुंबईत महिला बांधकाम व्यवसायिकावर गोळीबार; कारने जाताना वाटेत अडवले)

दालनाबाहेरील फलकावर लिहावे

सामान्य नागरिकांना कोणत्या दिवशी, कोणत्या वेळेत भेटणार आहात हे मंत्रालयातील दालनाबाहेरील फलकावर लिहावे असे आदेश सरकारने सर्व मंत्र्यांना दिले आहेत. तसेच विभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान दोन दिवस निश्चित करून तशी वेळ राखून ठेवावी असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणाऱ्या सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात मंगळवारी परिपत्रक जारी केले आहे. मंत्र्यांनी कामाचे स्वरूप लक्षात घेऊन अभ्यगतांना भेट देण्यासाठी आठवडा, पंधरवडा, महिन्यातील काही ठराविक दिवस किंवा वेळ निश्चित करावी असे यात नमूद करण्यात आले आहे.

जनतेच्या भेटीसाठी वेळ राखून ठेवा 

माहिती देणारा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावा जेणेकरून लोकांना रिकाम्या हाताने परत जावे लागणार नाही असे निर्देश देण्यात आले आहेत. मंत्रालयीन अधिकाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी ३ ते ४ ही वेळ जनतेच्या भेटीसाठी राखून ठेवावी व या कालावधीत शक्यतो विभागाच्या बैठका घेऊ नयेत असेही बजावण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.