मुंबईत जाणीवपूर्वक मराठी-गुजराती वाद निर्माण केला जातोय; MNS चा आरोप

214
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात ईशान्य मुंबईत निवडणूक सुरू आहे. त्यामुळे मराठी-गुजराती वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. हा प्रयत्न ठाकरे गटाकडून जाणीवपूर्वक केला जातो आहे, असा आरोप मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे यांनी केला.
मुंबईच्या एका गुजरातीबहुल सोसायटीमध्ये काही गुजराती रहिवाशांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांचा प्रचार करण्यापासून कार्यकर्त्यांना रोखले, असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. ठाकरे गटाच्या या आरोपानंतर मुंबईत मराठी-गुजराती वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर आता मनसेनेही प्रतिक्रिया दिली असून मुंबईत जाणीवपूर्वक मराठी गुजराती वाद निर्माण केला जात असल्याची आरोप मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.
ठाकरे गटाचे नेते म्हणत आहेत, त्यांना गुजराती लोक सोसायटीच्या आत येऊ देत नाहीत. पण काही दिवसांपूर्वीच मुंबईत ठाकरे गटानेच गुजराती समाजाचे मेळावे घेतले होते. वरळीत ‘केम छो वरळी’ असे होर्डींगही ठाकरे गटाकडून लावण्यात आले होते. तेव्हा त्यांना गुजराती लोकांचा पुळका होता. मात्र, आता त्यांना निवडणुकीसाठी मराठी माणसांची मते हवी आहेत. त्यामुळे गुजराती मराठी वाद निर्माण केला जातो आहे, असेही संदीप देशपांडे म्हणाले.

कंपनीला जनतेने धडा शिकवला 

दरम्यान, रविवारी एका कंपनीने ग्राफिक डिझायनर्सच्या जागेसाठी जाहिरात देताना त्यात मराठी मुलांनी अर्ज करू नये अट घातली होती. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. यासंदर्भातही संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली. “या प्रकरणातील मुलीला आम्ही फोन लावण्याचा प्रयत्न केला. पण तिचा फोन बंद होता. मात्र, ती जाहिरात देणाऱ्यांना आता जनतेने धडा शिकवला आहे. हे यश मनसेचे आहे. मनसेने (MNS) मराठी माणसांना आत्मविश्वास दिला आहे. त्यामुळे आम्हाला मैदानात उतरायचीदेखील गरज नाही, असे ते म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.