बाबरी पाडली तेव्हा तिथे शिवसेनेचा एकही नेता नव्हता! देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

137

काही लोकांना वाटते ते म्हणजे महाराष्ट्र, त्यांचा अवमान म्हणजे महाराष्ट्राचा अवमान, त्यांना सांगतो १८ प्रगड जातींच्या १८ कोटी जनतेनी बनवलेला म्हणजे महाराष्ट्र, शिवराय, डॉ. आंबेडकर यांचा सन्मान म्हणजे महाराष्ट्र सन्मान होय. मी हेही सांगतो तुम्ही म्हणजे हिंदू नाही आणि तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही, पण मी असे म्हणणार नाही कारण हिंदूंची संख्या मला कमी करायची नाही. जेव्हा तुम्ही भ्रष्टाचार करता, तुमचे सहकारी जेलमध्ये जातात, तेंव्हा महाराष्ट्र बदनाम होतो, महाराष्ट्राला कलंक लागतो. मशिदीवरील भोंगे उतरवायला हातभर फाटली आणि म्हणतात आम्ही बाबरी पाडली. बाबारीचा ढाचा पाडला तेव्हा हा देवेंद्र फडणवीस त्याच ठिकाणी होता, त्यानंतर १८ दिवस सेंट्रल जेलमध्ये घालवले, आम्ही विचारतो तेंव्हा तुम्ही कुठे होतात. बाबरी पाडली तेव्हा एकही शिवसेनेचा नेता तिथे नव्हता, असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

भाजपच्या पोलखोल अभियानाचा समारोपासाठी मुंबईतील सोमय्या ग्राऊंडवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुस्टर सभेचे आयोजन करण्यात आले. महापालिकेतील भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी हे अभियान राबवले होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार आशिष शेलार, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार अतुल भातखळकर आदी उपस्थित होते.

(हेही वाचा राज ठाकरे एकमेव बाळासाहेबांचे राजकीय वारसदार! मनसैनिकांची बॅनरबाजी)

कल्याणसिंगांनी कारसेवकांना पाठिंबा दिला, पण शिवसेना आज रामाच्या विरोधकांसोबत 

बाबरी पडल्यावर ३२ आरोपी होते, त्यात सगळे भाजपचे नेते होते, ३० वर्षे या सगळ्यांनी आरोप सहन केले, त्यात शिवसेनेचा एकही नेता आरोपी नव्हता. आमचा दोष एकच आम्हाला प्रसिद्धी करता येत नाही आणि अनुशासन तोडता येत नाही. ज्यावेळी बाबरी पाडली तेव्हा सर्वांनी मिळून ठराव झाला होता याचे कुणी श्रेय घ्यायचे नाही आणि सांगायचे ठरले ‘कार सेवकांनी ढाचा पाडला’, म्हणून सगळे म्हणू लागले. त्यावेळी कल्याणसिंग यांनी याला पाठिंबा दिला आणि तुम्ही ‘जे राम झाला नाही’, असे म्हणतात त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात, असेही फडणवीस म्हणाले.

म्हणून मेहबुबा मुफ्तीसोबत सरकार स्थापन केलेले 

आता हनुमान चालीसा म्हटले की राजद्रोह होतो. राणा दाम्पत्यावर आरोपपत्र दाखल केले त्यात म्हटले आहे कि ‘हनुमान चालीसा म्हणून राज्य उलथवून टाकण्याचा उद्देश होता.’ हनुमान चालीसा म्हटल्याने रामाचे राज्य उलथणार की रावणाचे? तुमचे राज्य कुणाचे आहे? मेहबुबा मुफ्ती बरोबर आम्ही राज्य स्थापन केले, कारण त्यावेळी पाकिस्तानने आव्हान दिले होते कि आम्ही काश्मीरमध्ये सरकार स्थापन करू देणार नाही म्हणून आम्ही सरकार बनवले आणि काम होताच लाथ मारून सरकार बरखास्त केले, पण काश्मीरमधून ३७० कलम रद्द करणारा एकच वाघ निघाला नरेंद्र मोदी. तिथे जत्रेसारखी गर्दी होऊ लागली आहे. आता म्हणतात चीनबद्दल बोला. आम्ही म्हणतो, ज्यांनी चीनला २ हजार हेक्टर जमीन चीनला दिली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता. तुम्हाला लाज वाटत नाही. आज अघोषित आणीबाणी आहे. पत्रकारांवर आरोप होत आहे. मोठी लिस्ट आहे. गदाधारी हिंदुत्व नाही तर रोज सकाळी गधा तुमच्या दारी असे तुमचे हिंदुत्व आहे, असेही फडणवीस म्हणाले. हनुमान चालीसा म्हटल्यामुळे रोजगार सुटणार का, असे शरद पवार म्हणतात रोजगाराचा प्रश्न इफ्तार पार्ट्या झोडल्याने सुटणार आहे का, असा सवाल फडणवीस यांनी विचारला.

(हेही वाचा पंजाबमध्ये देशातील पहिल्या मुस्लिमबहुल मलेरकोटला जिल्ह्यात फडकला खलिस्तानी झेंडा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.