संभाजीनगरमध्ये काही लोकांकडून नामांतराच्या मुद्द्यावरून औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी बुधवारी विशेष बाबअंतर्गत मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. त्यावेळी, औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई होणार, अशी ग्वाही दानवे राज्य सरकारकडून देण्यात आली.
आंदोलनकर्त्यांकडून कोणतीही वेळ न पाळता रात्री १२ वाजेपर्यंत घोषणाबाजी करून वेळेच्या नियमांचं उल्लंघन केले जात आहे, याकडेही दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. यावर सरकारकडून उत्तर देताना सांगण्यात आले की, या आक्षेपार्ह बाबीची शासनाकडून गंभीर दखल घेतली जाईल. आजच गृहमंत्री यांच्याशी चर्चा करून त्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले.
( हेही वाचा: संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी तिसऱ्या आरोपीला अटक )
त्याचप्रमाणे औरंगजेबाच समर्थीकरण व उदात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करून याबाबत तपासणी करण्यात यावी, असे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले.
Join Our WhatsApp Community