A Raja : भारत एक राष्ट्र नाही, आम्ही रामाचे शत्रू; द्रमुक नेते ए राजा यांची हिंदुद्वेषी गरळओक चालूच

A Raja : "तुम्ही म्हणत असाल की, अमुक एक तुमचा देव आहे. तुम्ही इतरांना भारत माता की जय बोलायला सांगत असाल, तर आम्ही तुमचा ईश्वर मानत नाही", अशी विद्वेषी गरळओक ए राजा यांनी केली आहे.

327
A Raja : भारत एक राष्ट्र नाही, आम्ही रामाचे शत्रू; द्रमुक नेते ए राजा यांची हिंदुद्वेषी गरळओक चालूच
A Raja : भारत एक राष्ट्र नाही, आम्ही रामाचे शत्रू; द्रमुक नेते ए राजा यांची हिंदुद्वेषी गरळओक चालूच

नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने द्रमुक (DMK) नेते उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांना हिंदुद्वेषी गरळओक केल्याच्या प्रकरणी फटकारले आहे. त्यानंतरही द्रमुक नेत्यांची गरळओक थांबलेली नाही. आता ए राजा (A Raja) यांनी हिंदु धर्मासह देशाविषयीही विद्वेषी वक्तव्ये केली आहेत.

(हेही वाचा – Lok Sabha Election : गुजरात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोढवाडिया भाजपात)

तुमच्या भारतमातेचा आम्ही स्वीकार करत नाही

भारत (Bharat) हे एक राष्ट्र नाही, ही गोष्ट सर्वांनी नीट समजून घ्या. भारत कधीच एक राष्ट्र नव्हते. भारत एक राष्ट्र नव्हे, तर हा एक उपखंड आहे. तुम्ही (सनातनवादी, हिंदुत्ववादी) म्हणत असाल की, अमूक एक तुमचा देव आहे आणि तुम्ही इतरांना ‘भारत माता की जय’ बोलायला सांगत असाल, तर आम्ही तुमचा ईश्वर मानत नाही. तुमच्या भारतमातेचा आम्ही स्वीकार करत नाही. त्यांना सांगा आम्ही सर्व जण रामाचे शत्रू आहोत. माझा रामायणावर आणि रामावर विश्वास नाही, असे विखारी उद्गार ए राजा यांनी काढले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

नुकतेच तमिळनाडूचे (Tamil Nadu) मुख्यमंत्री एम के स्टॅलिन (MK Stalin) यांचा मुलगा आणि तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांशी केली होती. तसेच त्यांनी सनातन धर्माविषयी काही वादग्रस्त वक्तव्ये केली होती. यावरून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारले होते. ‘तुम्ही तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर केला आहे आणि आता तुम्ही या प्रकरणी न्यायालयाकडून दिलासा मागताय ? तुम्ही सामान्य व्यक्ती नसून एक राजकारणी आहात’, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.

ए. राजा यांनी या वेळी हनुमानाची वानराशी तुलना केली आहे. तसेच ‘जय श्रीराम’ हा नारा घृणास्पद असल्याचे वक्तव्य केले.

भारत हा मोठा उपखंड

माजी केंद्रीय मंत्री ए. राजा भारतमातेवर गरळओक करतांना म्हणाले, “भारत कधीच एक राष्ट्र नव्हते. एका राष्ट्राचा अर्थ होतो, एक भाषा, एक परंपरा आणि एक संस्कृती. तेव्हा ते एक राष्ट्र असते. भारत एक राष्ट्र नाही. भारत एक उपखंड आहे. इथे तमिळ हे एक राष्ट्र म्हणजेच एक देश आहे. मल्याळम एक भाषा, एक राष्ट्र, एक देश आहे. उडिया एक भाषा, एक राष्ट्र आणि एक देश आहे. अशी सगळी राष्ट्रे मिळून भारत हा मोठा उपखंड तयार होतो. त्यामुळे भारत हा देश नसून एक उपखंड आहे.”

एखादा समाज गोमांस खात असेल, तर तुम्हाला काय अडचण ?

“या उपखंडात वेगवेगळ्या भाषा, परंपरा आणि संस्कृती आहेत. तुम्ही तमिळनाडूला आलात, तर तिथली वेगळी संस्कृती तुम्हाला पहायला मिळेल. केरळमधील संस्कृती वेगळी आहे. दिल्लीत वेगळी संस्कृती आहे. ओडिशात वेगळी संस्कृती आहे. काश्मीरमध्ये एक वेगळी संस्कृती आहे, तुम्ही त्या संस्कृतींचा स्वीकार करा. मणिपूरमधील लोक श्वानाचं (कुत्रा) मांस खातात. तुम्ही ती गोष्टदेखील स्वीकारली पाहिजे. एखादा समाज गोमांस खात असेल, तर त्यात तुम्हाला काही अडचण असण्याचं कारण नाही. त्या लोकांनी तुम्हाला गोमांस खायला सांगितलं आहे का? त्यामुळेच विविधतेत एकता असूनही आपल्यामध्ये मतभेद आहेत. परंतु, तुम्ही ते मतभेद स्वीकारले पाहिजेत, असे ए राजा यांनी स्वतःच्या विधानाचे स्पष्टीकरण दिले आहे. (A Raja)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.