India Pakistan Naval Collision : अरबी समुद्रात भारत आणि पाकिस्तानच्या नौदलाच्या जहाजांची धडक झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये पुन्हा राजनैतिक तणाव निर्माण झाला आहे. या घटनेनंतर भारताने नवी दिल्लीतील पाकिस्तानच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याला, तर पाकिस्तानने इस्लामाबादमधील भारताच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याला बोलावून निषेध नोंदवला. भारताने पाकिस्तानी नौदलाच्या युनिटच्या वर्तनाला “अस्वीकार्य आणि अव्यावसायिक” ठरवले आहे.
अरबी समुद्रात नेमकं काय घडलं?
15 सप्टेंबर 2026 ला, अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात घडली. भारतीय नौदलाचे एक जहाज नियमित निगराणी मोहिमेवर असताना पाकिस्तानी नौदलाच्या जहाजाशी त्याची धडक झाली. भारताच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानी नौदलाच्या युनिटने वेगाने पुढे येत असुरक्षित पद्धतीने हालचाली केल्यामुळे ही घटना घडली. (India Pakistan Naval Collision)
भारताने या घटनेत मोठे नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचे सांगितलेले नाही. मात्र, या घटनेनंतर दोन्ही देशांनी एकमेकांवर आरोप करत राजनैतिक पातळीवर निषेध नोंदवला आहे.
हेही वाचा: Semicon India 2026 : ‘चिप’ निर्मितीच्या जगात भारताची दमदार एन्ट्री; काय आहे भारताचा मास्टरप्लॅन
भारताकडून पाकिस्तानी राजनयिकाला समन्स
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने नवी दिल्लीतील पाकिस्तानच्या Charge d’Affaires यांना समन्स बजावून या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित पाकिस्तानी अधिकाऱ्यांपर्यंत भारताचा निषेध पोहोचवण्यास सांगण्यात आले आहे. (India Pakistan Naval Collision)
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सर्व लष्करी युनिट्सनी समुद्रात योग्य ती खबरदारी घ्यावी आणि दोन्ही देशांमधील संबंधित करारांचे पालन करावे, असे स्पष्ट केले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहनही भारताने केले आहे.
पाकिस्तानचा वेगळा दावा
या घटनेबाबत पाकिस्तानची भूमिका भारतापेक्षा वेगळी आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, त्यांचे नौदल SEASPARK-26 या द्वैवार्षिक सरावात सहभागी होते. हा सराव पाकिस्तानच्या Exclusive Economic Zone (EEZ) मध्ये सुरू होता. (India Pakistan Naval Collision)
याचवेळी भारतीय नौदलाच्या जहाजाने पाकिस्तानी जहाजाच्या अतिशय जवळ आक्रमक पद्धतीने हालचाली केल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे. पाकिस्तानने भारतीय नौदलाच्या कारवाईला “अत्यंत चिथावणीखोर आणि अस्वीकार्य” म्हटले आहे.
पाकिस्ताननेही इस्लामाबादमधील भारताच्या Charge d’Affaires यांना बोलावून या घटनेबाबत निषेध नोंदवला आहे. (India Pakistan Naval Collision)
1991 चा करार पुन्हा चर्चेत
या घटनेच्या केंद्रस्थानी 1991 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला लष्करी करार आहे. या कराराचा उद्देश लष्करी सराव, हालचाली आणि युद्धाभ्यासाबाबत आगाऊ माहिती देणे आणि गैरसमजामुळे निर्माण होणारी संकटाची परिस्थिती टाळणे हा आहे.
भारताने या करारातील Article 10 चा विशेष उल्लेख केला आहे. आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात दोन्ही देशांच्या नौदलाच्या जहाजांमध्ये आणि पाणबुड्यांमध्ये अपघात टाळण्यासाठी किमान 3 nautical miles अंतर असावे, अशी तरतूद त्यात आहे. (India Pakistan Naval Collision)
दरम्यान, या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी राजनैतिक पातळीवर निषेध नोंदवला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या लष्करी संघर्षानंतर पुन्हा एकदा दोन्ही देशांमधील समुद्री हालचाली आणि 1991 च्या कराराच्या अंमलबजावणीचा मुद्दा चर्चेत आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, दोन्ही बाजू या घटनेसाठी एकमेकांना जबाबदार ठरवत असल्यामुळे अरबी समुद्रातील या धडकेचा येणाऱ्या काळात भारत-पाक संबंधांवर काय परिणाम होतो, याकडे लक्ष लागले आहे.
हेही पाहा:
Join Our WhatsApp Community

