India – China : भारताकडून पूर्व लडाख सीमेवर आणखी १० हजार सैनिक तैनात

चीनसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील बरेली इथल्या क्षेत्राला पूर्ण सैन्य दलात रूपांतरित केले जाईल. सध्या ही एक लढाऊ व्यवस्था आहे ज्याची रचना प्रामुख्याने प्रशासकीय, प्रशिक्षण आणि इतर शांतता राखण्यासाठी केली गेली आहे. आता ते अतिरिक्त पायदळ, तोफखाना, विमानचालन, हवाई संरक्षण आणि अभियंता ब्रिगेडसह पूर्ण वाढ झालेल्या कोअरमध्ये रूपांतरित केले जाईल.

172
India - China : भारताकडून पूर्व लडाख सीमेवर आणखी १० हजार सैनिक तैनात

भारत आणि चीन (India – China) यांच्यातील पूर्व लडाख सीमेवर चीनच्या कारवाया पाहता भारताने आणखी १० सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेतला. भारताने पश्चिम सीमेवरून १० हजार सैनिकांची तुकडी हलवली असून हे सैनिक उत्तर सीमेवर तैनात करण्यात आले आहे. भारताच्या या भूमिकेमुळे चीनचा तिळपापड झाला आहे. तणाव कमी करण्याच्या दृष्टीने ही सैन्य तैनाती योग्य नसल्याचे चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हंटले आहे.

(हेही वाचा – Indian Music Therapy : परिपूर्ण उपचारासाठी भारतीय संगीत सर्वोत्कृष्ट; महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा बँकॉक येथे दावा)

भारताच्या निर्णयामुळे चिनचा तिळपापड :

भारताने हिमालयातील उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील चीनसोबतच्या (India – China) ५३२ किमी (३३१ मैल) सीमेचे रक्षण करण्यासाठी त्याच्या पश्चिम सीमेवरून १० हजार सैन्य तैनात केले आहे. भारताच्या या धोरणात्मक हालचालीमुळे चीन संतापला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणाले की, “आंतरराष्ट्रीय सीमा आणि त्याच्या आसपासच्या भागात शांतता आणि स्थिरतेसाठी आम्ही भारतासोबत एकत्र काम करण्यास तयार आहोत. परंतु, एलएसीवरील भारतीय हालचाली शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने योग्य नाहीत.” (India – China)

(हेही वाचा – Telangana : काँग्रेस शासित तेलंगणात पूजा करण्यासाठी गेलेल्या हिंदूंवर पोलिसांचा लाठीचार्ज)

बरेली क्षेत्राला पूर्ण सैन्य दलात रूपांतरित केले जाईल : 

चीनसोबत (India – China) वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील बरेली इथल्या क्षेत्राला पूर्ण सैन्य दलात रूपांतरित केले जाईल. सध्या ही एक लढाऊ व्यवस्था आहे ज्याची रचना प्रामुख्याने प्रशासकीय, प्रशिक्षण आणि इतर शांतता राखण्यासाठी केली गेली आहे. आता ते अतिरिक्त पायदळ, तोफखाना, विमानचालन, हवाई संरक्षण आणि अभियंता ब्रिगेडसह पूर्ण वाढ झालेल्या कोअरमध्ये रूपांतरित केले जाईल. भारत आणि चीन यांनी यापूर्वी लष्करी आणि मुत्सद्दी माध्यमांद्वारे संवाद सुरू ठेवण्याचे मान्य केले आहे आणि अलीकडेच सीमा विवाद सोडवण्याबाबत बैठकही झाली. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग पुढे म्हणाले की, सीमा भागातील शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी चीन भारतासोबत (India – China) काम करण्यास कटिबद्ध आहे. भारताचे पाऊल शांतता राखण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी अनुकूल नसल्याचे त्यांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.