अग्निवीर होण्यासाठी १० हजार मुली सज्ज

91

सरकारच्या अग्नीपथ योजनेबाबत तरुणांमध्ये प्रचंड उत्साह आहे. तिन्ही सेना दलातील तरुणांना अग्निवीर बनायचे असताना, तरुणीही यात मागे नाहीत. योजना सुरु झाल्यापासून नौदलाकडे तरुणींचे तब्बल 10 हजारपेक्षा अधिक अर्ज आले आहेत. विशेष म्हणजे गरज लागल्यास या सैनिकांना युद्धनौकांवरही तैनात केले जाणार आहे. नौदलासाठी 30 जुलैपर्यंत भरती प्रक्रिया चालेल.

( हेही वाचा: धान्य, डाळींसह शेतमालावर 5 टक्के जीएसटी )

हवाई दलाकडे 7.50 लाख अर्ज

  • अग्नीपथ योजनेअंतर्गत भारतीय हवाई दलाला 29 जूनपर्यंत 7.50 लाख उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. हवाई दलाची नोंदणी मंगळवारी बंद झाली. हवाई दलासाठी 24 जूनपासून नोंदणी प्रक्रिया सुरु झाली होती.
  • 26 जूनपर्यंत म्हणजे अवघ्या 3 दिवसांत 56 हजार 960 अर्ज प्राप्त झाले, तर 27 जूनपर्यंत 94 हजार 281 अर्ज प्राप्त झाल्याचे, भारतीय हवाई दलाने ट्वीटद्वारे कळवले आहे.
  • 1990 ला लष्कराची दारे महिलांसाठी खुली झाली. 2019-20 मध्ये लष्करातील अन्य पदांवर महिलांची भरती सुरु झाली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.