Jaipur Express Firing : असे घडले थरार नाट्य

हा सर्व थरार पहाटे २:५० ते ५:३० या वेळेत घडला

117
Jaipur Express Firing : असे घडले थरार नाट्य

जयपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये (Jaipur Express Firing) आज म्हणजेच सोमवार ३१ जुलै रोजी पहाटे पाचच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे आरपीएफ कॉन्स्टेबलनेच हा गोळीबार केला असून त्याला सध्या ताब्यात घेतलं आहे. मृतांमध्ये आरपीएफचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टीकाराम मीणा यांच्यासह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. चेतन सिंह असं आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबलचं नाव आहे. मानसिक तणावामुळे चेतन याने हा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

असे घडले थरार नाट्य

हा सर्व थरार (Jaipur Express Firing) पहाटे २:५० ते ५:३० या वेळेत घडला. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी चेतन हा उत्तर प्रदेशातील हाथरस येथील आहे. यापूर्वी त्याची पोस्टिंग गुजरातमध्ये होती. नुकतीच त्याची मुंबईत नियुक्ती झाली होती. एक्स्प्रेस ट्रेनवर (Jaipur Express Firing) नजर ठेवणं याला ट्रेन एस्कॉर्टिंग म्हणतात. ते ट्रेनने प्रवास करतात. काल आरोपी चेतनने सूरत रेल्वे स्थानकापर्यंत एक ट्रेन एस्कॉर्ट केली. सूरत रेल्वे स्थानकावर त्याने काही तास विश्रांती घेतली. आज पहाटे 2.50 वाजता चेतन सूरत रेल्वे स्थानकावरुन जयपूर मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये चढला. चेतनसोबत आणखी दोन हवालदार देखील होते. एएसआय टिकाराम हे या सर्वांचे नेतृत्व करत होते.

(हेही वाचा – Jaipur Express Firing : जयपूर एक्स्प्रेसमध्ये रेल्वे पोलिसांकडूनच गोळीबार; ४ जणांचा मृत्यू)

गोळीबाराची (Jaipur Express Firing) घटना घडण्यापूर्वी शेवटचा मुक्काम वापी होता. वापी ट्रेनचा पुढचा थांबा बोरीवली होता. पालघर रेल्वे स्थानकावरुन ट्रेन जात असताना चेतनने गोळीबार सुरु केला. विरार स्थानकानंतर आरोपीने चेन खेचली. आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता पण आधीच सतर्क झालेल्या रेल्वे स्टेशनवर पोलिसांनी त्याला पकडले. गाडी नंतर बोरीवली रेल्वे स्थानकावर नेण्यात आली, जिथे मृतदेह काढण्यात आला आणि शवविच्छेदनासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. सर्व मृतदेह शताब्दी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी कांदिवली येथे ठेवण्यात आले आहेत. त्यानंतर ट्रेन मुंबई सेंट्रल रेल्वे यार्डमध्ये पोहोचली.

एका वादामुळे आरोपीने केला गोळीबार?

प्रत्यक्षदर्शी यांनी दिलेल्या माहितीनुसार आरपीएफ (Jaipur Express Firing) हवालदार चेतन सिंहचा ट्रेनच्या डब्यातील काही प्रवाशांसोबत वाद झाला होता. यावेळी संतापलेल्या चेतन सिंहने प्रवाशांच्या दिशेने बंदूक उगारली. मात्र सहकाऱ्याने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु रागात असलेल्या चेतन सिंह याने कोणाचेही ऐकले नाही. तसेच त्याला थांबवणाऱ्या आरपीएफच्या कर्मचाऱ्यासह तीन प्रवाशांवर त्याने गोळीबार केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.