Commonwealth Games 2026 : ग्लासगो राष्ट्रकूल स्पर्धेचा दिमाखदार समारोप, २०३० साठी बॅटन भारताकडे

Commonwealth Games 2026 : ग्लासगो राष्ट्रकूल स्पर्धेचा दिमाखदार समारोप, २०३० साठी बॅटन भारताकडे

68
Commonwealth Games 2026 : ग्लासगो राष्ट्रकूल स्पर्धेचा दिमाखदार समारोप, २०३० साठी बॅटन भारताकडे
Commonwealth Games 2026 : ग्लासगो राष्ट्रकूल स्पर्धेचा दिमाखदार समारोप, २०३० साठी बॅटन भारताकडे
  • ऋजुता लुकतुके

स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे झालेल्या २०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा(Commonwealth Games 2026)समारोप भारतीय सांस्कृतिक वैभव, संगीत आणि उत्साहाच्या वातावरणातझाला. समारोप सोहळ्यात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा ध्वज आणि बॅटन अधिकृतपणे भारताकडे सुपूर्द करण्यात आले. यामुळे अहमदाबाद २०३० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा यजमान देश म्हणून भारताच्या प्रवासाला अधिकृत सुरुवात झाली. हा क्षण भारतीय क्रीडा इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. स्पर्धेची शताब्दी आवृत्ती २०३० मध्ये अहमदाबाद येथे होणार आहे.(Commonwealth Games 2026)

समारोप सोहळ्यात भारतीय सांस्कृतिक परंपरा आणि आधुनिक सादरीकरणाचा सुंदर संगम पाहायला मिळाला. गायक शंकर महादेवन यांनी आपल्या मुलांसह देशभक्तिपर गीतांची प्रभावी मैफल सादर केली, तर माजी विश्वसुंदरी मानुषी छिल्लर हिने भारतीय संस्कृतीचे आकर्षक दर्शन घडवले. ‘वंदे मातरम्’सह अनेक देशभक्तिपर गीतांनी संपूर्ण सभागृह भारावून गेले. भारतीय आणि स्कॉटिश कलाकारांच्या संयुक्त सादरीकरणामुळे सोहळ्याला आंतरराष्ट्रीय रंगत लाभली.(Commonwealth Games 2026)

(हेही वाचा – Maharashtra SDRF : पूरग्रस्त राज्यांना केंद्राकडून मदतीचा हात; महाराष्ट्राच्या वाट्याला किती निधी? )

भारताच्या ताफ्याची ध्वजवाहक म्हणून सुवर्णपदक विजेती मुष्टियोद्धा जैस्मिन लांबोरिया हिने तिरंगा हातात घेतला. संघांच्या संचलनावेळी भारतीय खेळाडूंचे भावी यजमान म्हणून उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. संपूर्ण सोहळ्यात स्कॉटलंडच्या पारंपरिक संगीतासोबत भारतीय कलाविष्काराचे दर्शन घडत राहिले.(Commonwealth Games 2026)

ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने १३ सुवर्ण, १७ रौप्य आणि ९ कांस्य अशी एकूण ३९ पदके जिंकून पदकतालिकेत चौथे स्थान मिळवले. बॉक्सिंग, अॅथलेटिक्स, पॅरा-अॅथलेटिक्स, वेटलिफ्टिंग आणि ज्युडो या खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. स्पर्धेच्या उपांत्य दिवशी भारताने एका दिवसात १६ पदके जिंकत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली होती.(Commonwealth Games 2026)

समारोप सोहळ्याच्या अखेरीस ग्लासगोने यशस्वी आयोजनाची सांगता करत अहमदाबादकडे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची धुरा सोपवली. भारतीय सांस्कृतिक सादरीकरण आणि ध्वज हस्तांतरणाचा सोहळा हा या समारंभाचा सर्वात संस्मरणीय क्षण ठरला. आता २०३० मध्ये अहमदाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेकडे संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे.(Commonwealth Games 2026)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.