प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अस्थिरतेचे वातावरण असतानाच उद्धव ठाकरे(UBT)यांच्या गोटातून एका धक्कादायक बातमीने खळबळ उडवून दिली आहे. पक्षात पडलेली फूट आणि काही खासदारांनी साथ सोडल्यानंतर आता ठाकरे गटाचे निष्ठावान आणि महत्त्वाचे नेते अंबादास दानवे यांच्या एका निर्णयाने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.(UBT)
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होत असताना, अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीचा मार्ग सोडून चक्क महायुतीच्या पॅनलला पसंती दिली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले असून, ही नव्या राजकीय समीकरणाची नांदी तर नाही ना, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.(UBT)
(हेही वाचा – Japan Earthquake : व्हेनेझुएलानंतर जपानमध्ये ६.९ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप )
या निवडणुकीत १२ जागांसाठी दोन मुख्य गट आमनेसामने आहेत. मविआचे अधिकृत पॅनल तयार असतानाही दानवे यांनी घेतलेली ही भूमिका अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का आहे. चार दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता, अशा संवेदनशील परिस्थितीत दानवेंचे हे पाऊल अधिकच संशयास्पद वाटत आहे.(UBT)
याबाबत विचारले असता, अंबादास दानवे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पक्षीय राजकारण नसते, हा निर्णय पूर्णपणे स्थानिक पातळीवरचा आहे,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. मात्र, यावर ठाकरे गटाच्या वरिष्ठांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. वरिष्ठ नेते या निर्णयाकडे कसे पाहतात आणि पक्षाची भूमिका काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.(UBT)
हेही पहा – https://www.youtube.com/watch?v=xHyJBszJnbg
Join Our WhatsApp Community

