
Mumbai: मुंबईतील वायुप्रदूषण रोखण्यासाठी आणि हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी महापालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ई शहर भागातील स्मशानभूमीमधून वायूचे उत्सर्जन रोखण्यासाठी तेथे ‘कार्बनमुक्त स्मशानभूमी वायुप्रदूषण नियंत्रण प्रणाली’ (कॅप्स) बसवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

