Air India १ सप्टेंबरपासून दिल्ली – वॉशिंग्टन विमानसेवा करणार बंद; काय आहे कारण ? 

246
Air India १ सप्टेंबरपासून दिल्ली - वॉशिंग्टन विमानसेवा करणार बंद; काय आहे कारण ? 

एअर इंडियाने (Air India) १ सप्टेंबरपासून दिल्ली ते वॉशिंग्टन डीसी विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या महत्त्वाच्या निर्णयामागे दोन महत्त्वाची कारणे दिली जात आहेत. एअर इंडियाच्या २६ बोईंग ७८७-८ विमानांना अपग्रेड करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे अनेक विमाने दीर्घकाळ उड्डाणासाठी उपलब्ध राहणार नाहीत. हे काम २०२६ च्या अखेरीपर्यंत सुरू राहणार आहे.

(हेही वाचा – व्होट जिहाद कोणत्या लोकशाहीत बसतो ? मंत्री Nitesh Rane यांचा सवाल)

याशिवाय पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद आहे. ज्यामुळे लांब पल्ल्याच्या उड्डाणांमध्ये अडचणी येत आहेत. १ सप्टेंबर २०२५ नंतर बुकिंग केलेल्या प्रवाशांशी संपर्क साधला जाईल आणि त्यांना दोन पर्याय दिले जातील. दुसऱ्या फ्लाइटमध्ये बुकिंग करण्याचा आणि पूर्ण परतावा मिळवण्याचा पर्याय असणार आहे. (Air India)

(हेही वाचा – Kapil Sharma च्या सुरक्षेत वाढ, कॅनडातील कॅफेवर दुसऱ्यांदा गोळीबार; बिश्नोई टोळीची धमकी)

प्रवासी अजूनही अलास्का एअरलाइन्स, युनायटेड एअरलाइन्स, डेल्टा एअरलाइन्स सारख्या एअर इंडियाच्या इंटरलाइन भागीदारांद्वारे जेएफके, न्यूयॉर्क, नेवार्क, शिकागो किंवा सॅन फ्रान्सिस्को मार्गे वॉशिंग्टन डीसीला जाऊ शकतात. एकाच तिकिटावर बॅगा थेट अंतिम स्थानावर पाठवल्या जातील. एअर इंडिया (Air India) अजूनही उत्तर अमेरिकेतील ६ शहरांमध्ये नॉन-स्टॉप उड्डाणे चालवत आहे. यामध्ये कॅनडातील टोरंटो आणि व्हँकुव्हरचा समावेश आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.