सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, मुंबईत आलेल्या IPS अधिकाऱ्याला सक्तीचे क्वारंटाइन

135

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक तर्कवितर्क लावले जात असताना आता सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटण्याहून मुंबईत आलेले आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने सक्तीने क्वारंटाइन केले आहे. बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी रविवारी हा आरोप केला असून, विनय तिवारी मुंबईत तपासासाठी आलेल्या बिहार पोलिसांच्या टीमचे नेतृत्व करत आहेत. सुशांतच्या वडिलांनी पाटण्यामध्ये केलेल्या तक्रारीच्या आधारावर तपास करण्यासाठी हे पथक मुंबईत आले आहे.

काय म्हटलं ट्विटमध्ये

बिहार पोलीस पथकाचे नेतृत्व करण्यासाठी आयपीएस अधिकारी विनय तिवारी रविवारी मुंबईत दाखल झाले. पण रात्री ११ वाजता मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी त्यांना सक्तीने क्वारंटाइन केले असे बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी ट्विट केले आहे. “विनंती करुनही त्यांना आयपीएस मेसमध्ये राहण्यासाठी जागा मिळाली नाही. ते गोरेगावच्या एका गेस्टहाऊसमध्ये राहत आहेत असे ते ट्विटमध्ये म्हणालेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.