WI vs IND सामना विराट कोहलीसाठी का आहे खास?

112

WI vs IND यांच्यामध्ये गुरुवार 100 वा कसोटी सामना होत आहे. हा सामना विराट कोहलीसाठी खास आहे. कारण, किंग कोहलीचा हा 500 वा आंतरराष्ट्रीय सामना असेल. अशी कामगिरी करणारा तो भारताचा चौथा क्रिकेटपटू बनेल. तो सचिन तेंडुलकर याच्यासोबत इतर खेळाडूंच्या यादीत विराजमान होणार आहे. विशेष म्हणजे, बीसीसीआयनेही विराटला शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर विराट कोहलीच कौतुक होत आहे.

भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने आतापर्यंत 499 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आज होणारा सामना विराट कोहलीचा 500 वा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना असेल.  इतके सामने खेळणारा विराट कोहली दहावा खेळाडू होणार आहे. भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर सर्वाधिक सामने खेळला आह. सचिन तेंडुलकरने  664 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

(हेही वाचा Muslim : शनी मंदिरातला पुजारी निघाला गुल्लू खान; पोलिसांनी केली अटक )

विराट कोहलीने आतापर्यंत 110 कसोटी, 274 वनडे आणि 115 वनडे असे एकूण 499 सामने खेळले आहेत. विराट कोहलीने आतापर्यंत 499 सामन्यातील 558 डावात फलंदाजी करताना 53.48 जबरदस्त सरासरीने 25461 धावा केल्या आहेत. विराट कोहलीच्या नावावर 75 शतके आणि 131 अर्धशतके आहेत. विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या   254* इतकी आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.