पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत; ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचा खोळंबा

156

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांची बॅड मॉर्निंग झाली आहे. पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकल वाहतूक सेवा विस्कळीत झाली असून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर ते बोरिवली रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून पश्चिम रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटं उशिराने सुरू आहे.

चारकमान्यांचा खोळंबा

तसेच ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे पश्चिम रेल्वेचा खोळंबा झाला असून पश्चिम रेल्वेवरील जलद लोकल सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या जलद मार्गावरील लोकलवर परिणाम झाला आहे. यामुळे सकाळी ऐन गर्दीच्या वेळी कामावर निघालेल्या चारकमान्यांचा खोळंबा झाला असून मुंबईकरांना रेल्वेच्या झालेल्या या समस्येमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

(हेही वाचा – ‘असानी’चे तीव्र चक्रीवादळात रुपांतर)

ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम सुरु

दरम्यान, पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पहाटे साडेपाच वाजता दहिसर ते बोरीवली रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटली. यानंतर प्रवाशांची अधिक गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाकडून तात्काळ ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. काही वेळातच लोकल सेवा सुरळीत होईल असे देखील रेल्वे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.