महावीर जन्म कल्याणक म्हणजेच Mahavir Jayanti

100

महावीर जन्म कल्याणक हा जैन धर्मातील सर्वात महत्त्वाचा धार्मिक सण आहे. जैन पंथीयांचे चोविसावे आणि शेवटचे तीर्थंकर (सर्वोच्च उपदेशक) महावीर (Mahavir Jayanti)  यांचा जन्म दिवस म्हणून हा सण साजरा केला जातो. जैन ग्रंथांनुसार, महावीरांचा जन्म ५९९ ईस पूर्व (चैत्र शुद्ध १३) मध्ये चैत्र महिन्यात झाला.

भगवान महावीर (Mahavir Jayanti) यांचा जन्म बिहारमधील क्षत्रियकुंड येथे झाला. कुंडग्रामचा राजा सिद्धार्थ आणि राणी त्रिशाला यांचे ते सुपुत्र होते. ते इक्ष्वाकु वंशाचे होते. काही आधुनिक इतिहासकार कुंडग्राम (जे बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील आजचे कुंडलपूर आहे) हे त्यांचे जन्मस्थान असल्याचे मानतात. वैशाली ही त्यांची राजधानी होती.

(हेही वाचा Japanese Navy Helicopters Crash: जपानी नौदलाचे २ हेलिकॉप्टर्स प्रशिक्षणादरम्यान प्रशांत महासागरात कोसळले; २ ठार, ७ बेपत्ता)

महावीरांना ‘वर्धमान’ हे नाव देण्यात आले, याचा अर्थ “जो वाढत जातो”, कारण त्यांच्या जन्माच्या वेळी राज्यात समृद्ध वाढत होती. या दिवशी महावीरांची मूर्ती रथावर बसवून रथयात्रा काढतात. वाटेत स्तवन (धार्मिक गाण्यांचे) पठण केले जाते. महावीरांच्या मूर्तीना अभिषेक केला जातो.

जैन समाजातील बहुतेक लोक धर्मादाय कार्य, प्रार्थना, पूजा आणि व्रत करतात. अनेक भाविक ध्यान आणि प्रार्थना करण्यासाठी महावीरांना (Mahavir Jayanti) समर्पित मंदिरांना भेट देतात. सद्गुणाचा मार्ग सांगण्यासाठी मंदिरांमध्ये भिक्षूंचे प्रवचन आयोजित केले जातात. गोहत्या थांबवणे किंवा गरीब लोकांना अन्न पुरवण्यास मदत करणे यासारख्या धार्मिक कार्यात लोक सहभाग घेतात.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.