हृदयद्रावक! तीन जिगरी मित्रांचा भीषण अपघातात मृत्यू, गावावर शोककळा!

94

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात तीन जीगरी मित्रांचा मृत्यू झाला आहे. उसाच्या ट्रेलरला कार मागून धडकल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. तीनही मित्रांचा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या अपघातात राहुल आळेकर, केशव रायकर, आकाश खेतमाळीस या तीन मित्रांचा मृत्यू झाला आहे.

Accident

अपघातात मित्रांचा मृत्यू

राहुल आळेकर, केशव सायकर आणि आकाश खेतमाळीस हे तिघेजण कारमधून प्रवास करत होते. मध्यरात्री श्रींगोदा काष्टी रस्त्यावरील हॉटेल अनन्या जवळ ऊसाच्या ट्रेलरला धडक दिल्यानं अपघात झाला. ही घटना मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच, अनन्या हॉटेलमधील व्यक्तींनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त युवकांना कारमधून बाहेर काढण्यात आले. यावेळी केशव सोयकर आणि आकाश खेतमाळीस या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता.  तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमी राहुल याला श्रीगोंद्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. एकाच वेळी तीन मित्रांच्या अपघाती मृत्यूमुळं काष्टी गावावर शोककळा पसरली आहे.

( हेही वाचा :चैत्यभूमीवर व्ह्युविंग गॅलरीला माता रमाबाई आंबेडकर यांचे नाव: शिवसेनेने घाईघाईत केली मागणी )

मित्राला सोडताना झाला अपघात

राहुल सुरेश आळेकर वय 22, केशव सायकर वय 22,आकाश रावसाहेब खेतमाळीस वय 18 हे तिघे मित्र कारमधून श्रीगोंदा येथून काष्टीकडे जात होते. राहुल आणि आकाश हे आपला मित्र केशव सायकरला घरी सोडण्यासाठी काष्टीला जात असताना अपघात झाला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.