तरुणींनो प्रेम करत असाल, तर सांभाळा स्वतःला …

80

प्रियकराकडे लग्नासाठी तगादा लावणाऱ्या तरुणींचे जीव धोक्यात आले आहेत. मागील तीन महिन्यांत मुंबई, विरार परिसरात तीन ते चार मुलींना या कारणासाठी जीव गमवावा लागला आहे. या तरुणींचे एकच चूकले होते, ते म्हणजे ज्या तरुणांवर त्यांनी जीवापाड प्रेम केले, त्याने आयुष्यभरासाठी आपले म्हणून त्यांच्याकडे लग्नासाठी तगादा लावला होता.

दोन मित्रांच्या मदतीने हत्या

कुर्ला पश्चिमेला असलेल्या एचडीआयएल कॉलनी या ठिकाणी दोन आठवड्यापूर्वी एका तरुणीची हत्या करण्यात आली होती. या तरुणीची हत्या तिच्या प्रियकराने दोन मित्रांच्या मदतीने केल्याचे उघड झाले होते. पोलिसांच्या तपासात हत्येचे धक्कादायक कारण पुढे आले, ते म्हणजे या तरुणाने प्रियकराकडे लग्न करण्यासाठी तगादा लावला होता, त्यातून प्रियकराने तिला गोवंडी येथून कुर्ला येथे भेटण्यास बोलावून दोन मित्रांच्या मदतीने तिची हत्या केली. या घटनेची पुनरावृत्ती दोन दिवसांपूर्वी विरार येथे झाली.

(हेही वाचा 1 कोटीचा रस्ता बांधला अन् उद्घाटनावेळीच खड्डा पडला)

दहा किलोचा दगड बांधून मृतदेह खाडीत सोडला

विरारच्या म्हारंबळ पाडा येथे असलेल्या जेट्टी नंबर २२ येथील खाडीत एका २५ वर्षांच्या तरुणीचा मृतदेह मिळाला होता. स्थानिक पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असता या तरुणीचा कंबरेला एक दोर बांधण्यात आला होता. पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटवली असता ही तरुणी विरार पूर्वेतील फुलपाडा परिसरात राहणारी असल्याचे समोर आले. रेश्मा खाडे असे या तरुणीचे नाव होते. गुन्हे शाखेने या प्रकरणी या तरुणीचा प्रियकर हर्षद पाटील (२८) आणि त्याचा मित्र क्रितेश केणी (२६) या दोघांना अटक करण्यात आली. रेश्मा ही लग्नासाठी सतत मागे तगादा लावत असल्यामुळे तिला भेटण्यासाठी जेट्टी येथे बोलावून त्या ठिकाणी तिची हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या मृतदेहाला दहा किलो वजनाचा दगड बांधून मृतदेह खाडीत सोडला, त्यानंतर तिचा मोबाईल कर्नाटक राज्यात जाणाऱ्या एका ट्रक मध्ये टाकला असल्याची कबुली दोघांनी दिली.

चारही घटना दोन महिन्यांच्या अंतरावर

अशीच दुसरी घटना विरार पूर्वेतील कारगिल नगर येथे घडली होती, वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या प्रिया कांबळे (२५) हिची तिच्या प्रियकराने हत्या केली होती. लग्न झाल्यानंतर देखील प्रियाने प्रियकराकडे लग्नासाठी तगादा लावला होता. या प्रकरणी मोहम्मद हसीन मलिक या प्रियकराला कुर्ला येथून अटक करण्यात आली होती. वसई पूर्व येथे महुबा बीबी या विवाहितेची हत्या गेल्या महिन्यात तिच्याच घरात झाली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिचा प्रियकराला अटक केली होती. महुबा बीबी ही सतत प्रियकराच्या मागे लग्न करण्यासाठी तगादा लावून त्याला धमक्या देत होती, म्हणून त्याने तिचा गळा आवळून हत्या केल्याची कबुली अटक प्रियकराने दिली होती. या चारही घटना दोन महिन्यांच्या अंतरावर झालेल्या असून या चारही हत्येत एकच कारण पुढे आले आहे ते म्हणजे लग्नासाठी तगादा लावणे आणि धमक्या देणे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.