India’s Airlift mission : जाणून घ्या भारतातल्या टॉप ६ एअरलिफ्ट मिशनबद्दल

102
India's Airlift mission : जाणून घ्या भारतातल्या टॉप ६ एअरलिफ्ट मिशनबद्दल

गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवार, ७ ऑक्टोबर रोजी इस्त्राईलमध्ये घुसखोरी केली, तसेच ५ हजार रॉकेटचा मारा केला. यामध्ये इस्रायलचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणी अमेरिकेसह भारतानेही इस्रायलला पाठिंबा दिला आहे. (India’s Airlift mission)

या युद्धाच्या काळात भारताने इस्त्रायलच्या नागरिकांना सर्वतोपरी मदत केली आहे. तसेच इस्त्रायलमध्ये वास्तव्यास असणाऱ्या भारतीयांना सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन अजय’ (Operation Ajay) या नावाने एअरलिफ्ट मिशन सुरु केले.

या मोहिमेअंतर्गत पहिले विशेष विमान (India’s Airlift mission) गुरुवार १२ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी बेन गुरियन विमानतळावरून रात्री ९ वाजता २१२ प्रवाशांना घेऊन भारताकडे रवाना झाले होते. हे विमान शुक्रवार १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता भारतात पोहोचले. आतापर्यंत ऑपरेशन अजयच्या माध्यमातून पाच तुकड्यांमधून तब्बल १,२०१ भारतीयांना मायदेशी सुखरूप आणले गेले आहे.

(हेही वाचा – PLANE CRASH : बारामतीत शिकाऊ विमान कोसळले, पायलट किरकोळ जखमी)

याच पार्श्वभूमीवर आपण भारतातल्या टॉप ६ एअरलिफ्ट मिशनबद्दल थोडक्यात जाणून घेऊया

भारताने १९९० पासून ते २०२२ पर्यंत एकूण ६ एअरलिफ्ट मिशन (India’s Airlift mission) यशस्वीपणे राबवली आहेत. १९९० रोजी ‘ऑपरेशन कुवैत’ , २००६ रोजी ‘ऑपरेशन सुकून’, २०१५ रोजी ‘ऑपरेशन मैत्री’ आणि ‘ऑपरेशन राहत’, २०२१ मध्ये ‘ऑपरेशन देवी शक्ती’ तर २०२२ मध्ये ‘ऑपरेशन गंगा’ अशी एकूण सहा प्रमुख मिशन राबवली आहेत.

१. ऑपरेशन कुवेत

भारताची सर्वांत मोठी एअरलिफ्ट मोहीम (India’s Airlift mission) १९९० साली झाली होती. संपूर्ण मध्यपूर्वेत तणाव वाढला होता. त्यानंतर इराकी हुकूमशहा सद्दाम हुसेनने कुवेतवर आक्रमण केले. जेव्हा सद्दाम हुसेनने कुवेतवर हल्ला केला तेव्हा त्या देशात १.५ लाखांहून अधिक भारतीय होते. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ऑपरेशन कुवेत एअरलिफ्ट हे मिशन राबवले. या मोहिमेदरम्यान कुवेतमधून केवळ ५९ दिवसांमध्ये ४८८ विमानांमधून तब्बल १ लाख ७५ हजारांहून अधिक भारतीयांना भारतात परत आणण्यात आले.

भारताच्या या मोहिमेची (India’s Airlift mission) गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दखल घेण्यात आली आहे. तसेच या मोहिमेसाठी एअर इंडियाला ‘नागरी एअरलाइन पुरस्कार’ देण्यात आला आहे.

२. ऑपरेशन सुकून

ऑपरेशन सुकून (India’s Airlift mission) हे भारतीय नौदलाने २००६च्या लेबनॉन युद्धादरम्यान भारतीय, श्रीलंकेचे आणि नेपाळी नागरिक तसेच भारतीय जोडीदार असलेल्या लेबनॉनच्या नागरिकांना संघर्षक्षेत्रातून बाहेर काढण्यासाठी सुरू केलेले ऑपरेशन होते. लेबनॉनमधील १०,००० हून अधिक भारतीय नागरिकांपैकी जवळजवळ २,००० लोकांच्या जीवाला धोका होता. लष्करी साधनांची कमतरता असलेल्या शेजारील देश श्रीलंका आणि नेपाळनेही भारत सरकारला त्यांच्या नागरिकांना सोडवण्यासाठी मदत मागितली. त्यामुळे एकूण २२०० हून अधिक नागरिकांना रेस्क्यू करण्यात आले.

३. ऑपरेशन मैत्री

ऑपरेशन मैत्री (ऑपरेशन एमिटी) (India’s Airlift mission) हे एप्रिल २०१५ च्या नेपाळ भूकंपानंतर भारत सरकार आणि भारतीय सशस्त्र दलांनी नेपाळमध्ये केलेले बचाव आणि मदत कार्य होते. भूकंपाच्या काही मिनिटांतच भारत सरकारने या बचावकार्यास सुरुवात केली. २६ एप्रिल २०१५ रोजी याची सुरुवात झाली आणि त्यात मार्गदर्शन, मदत आणि बचावासाठी इंटरफेससाठी भारताच्या गोरखा रेजिमेंटमधील नेपाळी माजी सैनिकांचाही समावेश होता.

४. ऑपरेशन राहत

येमेनमधील भारतीय नागरिक आणि परदेशी नागरिकांना येमेनमधील संकट काळात सौदी अरेबिया आणि त्याच्या मित्रराष्ट्रांच्या २०१५ च्या लष्करी हस्तक्षेपाच्या वेळी येमेनमधून बाहेर काढण्यासाठीचे एक ऑपरेशन (India’s Airlift mission) होते. एडन बंदरातून १ एप्रिल २०१५ रोजी सागरी मार्गाने निर्वासन सुरू झाले. भारतीय हवाई दल आणि एअर इंडियाने ३ एप्रिल २०१५ रोजी सना येथून हवाई मार्गक्रमण सुरू केले. ४१ देशांतील ९६० परदेशी नागरिकांसह ४६४० हून अधिक भारतीय नागरिकांना येमेनमधून बाहेर काढण्यात आले. हवाई ऑपरेशन ९ एप्रिल २०१५ रोजी संपले, तर सागरी ऑपरेशन ११ एप्रिल २०१५ रोजी संपले.

५. ऑपरेशन देवी शक्ती

अफगाणिस्तानातून अमेरिकेचे बहुतांश सैन्य माघारी घेण्याबरोबरच, तालिबान आणि संलग्न दहशतवादी गटांनी १ मे २०२१ रोजी व्यापक आक्रमण सुरू केले. ऑपरेशन देवी शक्ती (India’s Airlift mission) हे अफगाणिस्तान इस्लामिक प्रजासत्ताकाचे पतन झाल्यानंतर आणि राजधानी काबूल तालिबानच्या ताब्यात गेल्यानंतर अफगाणिस्तानमधून भारतीय नागरिक आणि परदेशी नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांचे एक ऑपरेशन होते. काबूलमधील बिघडलेली सुरक्षा परिस्थिती पाहता भारताने ८०० हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवले.

६. ऑपरेशन गंगा

ऑपरेशन गंगा (India’s Airlift mission) हे २०२२ च्या युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणादरम्यान शेजारील देशांमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी भारत सरकारने हाती घेतलेले एक अभियान होते. या देशांच्या मदतीने रोमेनिया, हंगेरी, पोलंड, मोल्डोव्हा आणि स्लोव्हाकियाहून नागरिकांना भारतात आणण्यात आले. आक्रमणादरम्यान भारताने रशिया किंवा युक्रेनला पाठिंबा न देता तटस्थ भूमिका कायम ठेवली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.