Govind Dev Giri Ji Maharaj : स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत व्हावे; रमेश शिंदे यांनी केला गुणगौरव

Govind Dev Giri Ji Maharaj : भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला स्वत: भगवद्गीता सांगितल्यानंतर अर्जुन धर्मयुद्धासाठी प्रेरित झाला, म्हणजे या मार्गदर्शनानंतर अर्जुन कर्तव्यपूर्ततेसाठी सिद्ध झाला. त्याप्रमाणे स्वामीजींच्या मार्गदर्शनाने हिंदूंनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी, धर्म संस्थापनासाठी आणि मंदिरांच्या रक्षणासाठी कार्यरत व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केले.

135
Govind Dev Giri Ji Maharaj : स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत व्हावे; रमेश शिंदे यांनी केला गुणगौरव
Govind Dev Giri Ji Maharaj : स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत व्हावे; रमेश शिंदे यांनी केला गुणगौरव

स्वामी हे राष्ट्रयोगी संत आहेत. धर्म आणि अध्यात्म यांसह राष्ट्रविषयक महत्त्वाचे विचारधन स्वामीजी देत आहेत. हिंदुत्वाच्या कार्यामध्ये अडचणी येतात, धर्मकार्य करतांना पुढे कसे जायचे ? याचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा सर्व हिंदुत्वनिष्ठांसाठी स्वामी मार्गदर्शक ठरतात. भारतातील सर्व हिंदुत्वनिष्ठांसाठी स्वामीची पितृतुल्य स्थानी आहेत. समस्त हिंदुत्वनिष्ठ सहजपणे त्यांच्याकडे जाऊन सल्ला घेतात आणि त्यातून पुढे जाण्याचा मार्ग मिळतो. भारतीय संस्कृतीची प्राचीन परंपरा सांगण्याचे महत्कार्य स्वामीजींकडून चालू आहे. राममंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) उभारणीच्या वेळी आलेल्या अनेक समस्या स्वामीजींनी लिलया पेलल्या. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला स्वत: भगवद्गीता सांगितल्यानंतर अर्जुन धर्मयुद्धासाठी प्रेरित झाला, म्हणजे या मार्गदर्शनानंतर अर्जुन कर्तव्यपूर्ततेसाठी सिद्ध झाला. त्याप्रमाणे स्वामीजींच्या मार्गदर्शनाने हिंदूंनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी, धर्म संस्थापनासाठी आणि मंदिरांच्या रक्षणासाठी कार्यरत व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केले. (Govind Dev Giri Ji Maharaj)

(हेही वाचा – Govind Dev Giri Ji Maharaj : अमृत महोत्सवाच्या निमित्ताने प.पू. स्वामी गोविंद देवगिरि महाराज यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भव्य सन्मान)

ते १४ जानेवारी रोजी दादर, मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात संपन्न झालेल्या स्वामीजींच्या अमृत महोत्सव सन्मान सोहळ्यात बोलत होते. हा सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) आणि हिंदु जनजागृती समिती (Hindu Janajagruti Samiti) यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

या वेळी व्यासपिठावर विधानपरिषदेच्या उपसभापती आमदार नीलम गोऱ्हे, आमदार आणि भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर, भाजपचे आमदार अधिवक्ता आशिष शेलार, खासदार राहुल शेवाळे, ‘सुदर्शन न्यूज’चे संपादक सुरेश चव्हाणके आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

रामललासाठी आदर्श कोषाध्यक्ष लाभले !

या प्रसंगी रमेश शिंदे पुढे म्हणाले की, रामराज्याला आपण आदर्श मानतो. रामराज्य आदर्श होते; कारण प्रभु श्रीराम आदर्श होतेच; परंतु रामराज्यातील प्रधान, सेनापती आणि कोषाध्यक्ष हेही आदर्श होते. २२ जानेवारी या दिवशीचा सोहळा भारताच्या बाहेरही साजरा केला गेला. अशा आदर्श राज्याच्या म्हणजे रामललासाठी कोषाध्यक्षही आदर्श मिळाले आहेत, अशा शब्दांत रमेश शिंदे यांनी प.पू. स्वामी गोविंद देवगिरी यांचा गौरव केला.

स्वामीजींचे कार्य स्वामी विवेकानंद यांच्याप्रमाणे ! – आमदार आशिष शेलार, भाजप

प.पू. स्वामी गोविंद देवगिरि महाराज यांची अनेक पुस्तके मी वाचली आहेत. स्वामीजींची शिकवण केवळ प्रवचनातून नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून शिकवण देत आहेत. स्वामीजींच्या वाणीत सरस्वतीमातेचा वास आहे. कलियुगात स्वामीजींचे कार्य स्वामी विवेकानंदाप्रमाणे मला वाटते. जन्म-मृत्यू यांच्या फेर्‍यांतून सुटका सदाचारातून होते आणि स्वामीजी या विचारांचे पाईक आहेत. (Govind Dev Giri Ji Maharaj)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.