पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय जवानांचं चोख प्रत्युत्तर

90

पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत बीएसएफ जवानांवर गोळीबार केला. यादरम्यान, या गोळीबाराला जवावांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान रेंजर्सनी मंगळवारी सकाळी जम्मू-काश्मीरमधील अर्निया सेक्टरमध्ये गस्त घालणाऱ्या जवानांवर गोळीबार केला आहे. त्यालाच जम्मूच्या बीएसएफ तुकडीने चोख प्रत्युत्तर दिले आहे. यामध्ये बीएसएफचे कोणतेही नुकसान झाले नाही, असे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – ट्रेनला उशीर झाल्यास, IRCTC प्रवाशांना पुरवणार ‘या’ FREE सेवा)

दरम्यान, पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत असून गेल्या काही दिवसांत जम्मूचा काही भाग या हल्ल्यामुळे अशांत आहे. त्याचबरोबर पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना खतपाणी घालण्यात येत असल्याची माहितीही समोर आली आहे.

याआधी २५ ऑगस्ट रोजी पाकिस्तानच्या एका घुसखोराने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी बीएसएफने तस्करीचा मोठा कट हाणून पाडला होता. सांबा जिल्ह्यातील सीमेवर एका पाकिस्तानी घुसखोरांकडून ८ किलो हेराॉईन जप्त केले होते. या दरम्यान, घुसघोराला गोळीदेखील लागली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.