पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीत कार घुसली; 7 वारकऱ्यांचा मृत्यू

100

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत सांगोला तालुक्यातील जुनोनी या गावात कार घुसल्याने ६ जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

( हेही वाचा : पराभवानंतर टीम इंडियाला अजून एक धक्का! हा खेळाडू संघाबाहेर होणार?)

जुनोनीजवळ दिंडीमध्ये कार घुसल्याने ६ वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. हे वारकरी करवीर तालुक्यातील जठारवाडी गावातील होते. कार्तिकी यात्रेसाठी हे वारकरी पंढरपूरात जात असताना हा अपघात झाला. या दिडींमध्ये एकूण ३२ वारकरी होते, ही दिंडी जुनोनीजवळ आली असता मागून येणारी टाटा नेक्सोन कार या दिंडीत घुसली.

या अपघातामध्ये ६ वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून यामध्ये ५ महिला वारकरी, एका पुरूष वारकऱ्याचा समावेश आहे. सांगोला पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

मृत वारकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा

याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये तातडीच्या मदतीची देखील त्यांनी घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी हे वृत्त कळताच तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला तसेच या घटनेतील जखमी वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार देण्यात यावे असे निर्देश दिले. हा अपघात कसा झाला याविषयी तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.