Attack On Indian Parliament : देशाच्या मानबिंदूवर झालेल्या हल्ल्याला २२ वर्षे पूर्ण

Attack On Indian Parliament : लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या 5 दहशतवाद्यांनी भारतीय संसदेवर हल्ला केला. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना ठार केले. या हल्ल्यात 6 पोलीस कर्मचारी आणि 3 संसद कर्मचारी ठार झाले, तर अन्य 15 जण जखमी झाले.

230
Attack On Indian Parliament : देशाच्या मानबिंदूवर झालेल्या हल्ल्याला २२ वर्षे पूर्ण
Attack On Indian Parliament : देशाच्या मानबिंदूवर झालेल्या हल्ल्याला २२ वर्षे पूर्ण

13 डिसेंबर ! जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीवरील दहशतवादी हल्ल्याला 22 वर्षे पूर्ण झाली. (Attack On Indian Parliament) देशाच्या मानबिंदूवर झालेला हल्ला हा काळा दिवसच होता ! 22 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी हिवाळी अधिवेशन चालू असतांना संसद भवनावर (Parliament House) दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात संसद भवनाचे पहारेकरी आणि दिल्ली पोलीस (Delhi Police) कर्मचाऱ्यांसह एकूण 9 जण ठार झाले आणि सुमारे 15 जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता.

(हेही वाचा – Underground Garbage Bins : मुंबईत साडेबारा लाखांची कचरा पेटी, कशी असेल ही कचरा पेटी, जाणून घ्या)

संसदेवर हल्ला कसा झाला ?

संसदेचे हिवाळी अधिवेशन (Winter Session of Parliament) सुरू असतांना अचानक संसदेच्या आवारात गोळीबाराचा आवाज ऐकू येऊ लागला. एके-47 घेतलेले आणि पांढऱ्या ॲम्बेसेडर कारमध्ये असलेले दहशतवादी संसदेच्या परिसरात घुसले. धक्कादायक म्हणजे दहशतवादी संसद परिसरात घुसून गोळीबार करेपर्यंत सुरक्षा कर्मचाऱ्यांना ते दहशतवादी असल्याचे कळलेच नव्हते.

दहशतवाद्यांनी लष्कराचा गणवेश घालून संसदभवन परिसरात प्रवेश केला होता. पांढऱ्या ॲम्बेसेडर गाडीवर लाल दिवा आणि गृह मंत्रालयाचे स्टिकर होते. संसद संकुलात प्रवेश केल्यानंतर दहशतवाद्यांची गाडी इमारतीच्या गेट क्रमांक 12 कडे जात असताना एका सुरक्षा रक्षकाला संशय आला. सुरक्षा रक्षकाने गाडीला परत येण्यास सांगितले. तोपर्यंत ॲम्बेसेडरने तत्कालीन उपराष्ट्रपती कृष्णकांत यांच्या गाडीला धडक दिली होती. यानंतर एके-47 शस्त्रे घेतलेले दहशतवादी कारमधून बाहेर पडले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला होता. (Attack On Indian Parliament)

(हेही वाचा – Old Pension Scheme : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी १४ डिसेंबर रोजी सरकारी अधिकाऱ्यांचे राज्यव्यापी ‘सामूहिक रजा’ आंदोलन)

संसदेवर झालेल्या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला होता. लष्कर-ए-तोयबा (Lashkar-e-Taiba) आणि जैश-ए-मोहम्मदच्या (Jaish-e-Mohammed) 5 दहशतवाद्यांनी भारतीय संसदेवर हल्ला केला. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना ठार केले. या हल्ल्यात 6 पोलीस कर्मचारी आणि 3 संसद कर्मचारी ठार झाले, तर अन्य 15 जण जखमी झाले.

संसदेवर हल्ला झाला तेव्हा कोण होते सत्ताधारी ?

त्या वेळी अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) पंतप्रधान होते. 19 मार्च 1998 ते 22 मे 2004 या कालावधीत ते निवडून आले. हल्ल्यापूर्वी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) त्यांच्या निवासस्थानी रवाना झाले होते.

महम्मद अफझल कोण होता ?

महम्मद अफझल (Muhammad Afzal) हा जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी होता. भारतीय संसदेवरील हल्ल्यासाठी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या महम्मद अफझलला जम्मू-काश्मीरमधून (Jammu and Kashmir) अटक करण्यात आली. महम्मद अफझलला 2002 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) आणि 2006 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फाशीची शिक्षा सुनावली होती. 9 फेब्रुवारी 2013 रोजी सकाळी दिल्लीच्या तिहार तुरुंगात महम्मद अफझलला फाशी देण्यात आली. (Attack On Indian Parliament)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.